केवळ परप्रांतीयच गुन्हे करतात का ? टार्गेट करणे योग्य नाही, ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

| Updated on: Sep 14, 2021 | 10:28 PM

मुख्यमंत्र्यांनी परप्रांतियांना उद्देशून दिलेल्या आदेशाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला. त्यांनी एखाद्या समाजाला लक्ष्य करणे योग्य नाही, असे म्हणत परप्रांतियांची एका प्रकारे पाठराखण केली आहे.

केवळ परप्रांतीयच गुन्हे करतात का ? टार्गेट करणे योग्य नाही, ठाकरेंच्या त्या आदेशानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
चंद्रकांत पाटील
Follow us on

पुणे  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) परप्रांतियांना उद्देशून दिलेल्या आदेशाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी समाचार घेतला. त्यांनी एखाद्या समाजाला लक्ष्य करणे योग्य नाही, असे म्हणत परप्रांतियांची एका प्रकारे पाठराखण केली आहे. ते मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. (all non marathi people parprantiya are not criminals said chandrakant patil criticizes uddhav thackeray)

केवळ परप्रांतीयच अशा प्रकारचे गुन्हे करतात का ?

मुंबई येथील साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयात आयोजित बैठकीत महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे सांगितले. तसेच परप्रांतातून येणाऱ्या लोकांच्या नोंदी ठेवण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. राज्यात बाहेरून कोण येतो, कोठून येतो, कोठे जातो याची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. याविषयी पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आले. यावर बोलताना केवळ परप्रांतीयच अशा प्रकारचे गुन्हे करतात का, याचा विचार करावा. अशा प्रकारे एखाद्या समाजाला टार्गेट करण्यात काही अर्थ आहे, असे आपल्याला वाटत नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष हवा

तसेच पुढे बोलताना महिलांच्या रक्षणासाठी शक्ती कायद्याला सर्वांनीच पाठिंबा दिला पाहिजे. हा विषय ऐरणीवर आलेला आहे. तसाच राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष हवा हा विषयही ऐरणीवर आल्याची आठवण चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला करुन दिली.

मुख्यमंत्री मंत्रालयात न जाता मातोश्रीमध्ये बसून निर्णय घेतात

“मुख्यमंत्री मंत्रालयात न जाता मातोश्रीमध्ये बसून निर्णय घेतात आणि जनतेवर निर्बंध घालतात. पण त्यांनी जनतेची मानसिकता समजून घ्यायला हवी. भारतीय समाज उत्सवप्रिय आहे. त्याला दीड वर्षे डांबून ठेवल्यावर अजून बंधनात ठेवता येणार नाही. हे लक्षात घेऊनच निर्बंध घालावे लागतील. मुलांना अधिक काळ शाळांपासून दूर ठेवले तर त्यांच्यावर मानसिक परिणाम होतील. सरकार सतत निर्बंध लादून कारवाया करणार असेल तर त्यातून असंतोष निर्माण होईल,” अशा शब्दात पाटील यांनी ठाकरे सरकारच्या कोरोना विषय नियमांचा समाचार घेतला.

निर्णय घेऊन बिल्डरांचा फायदा

“पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील ॲमेनिटी स्पेस खासगी सहभागाने विकसित करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने अपप्रचार चालविला आहे. तथापि, आपण लवकरच याबाबत सविस्तर माहिती देणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी किती ॲमेनिटी स्पेस बळकावल्या व त्यांची भाड्याची किती रक्कम थकीत आहे; तसेच महाविकास आघाडीने ॲमेनिटी स्पेससाठी पंधरा टक्केऐवजी पाच टक्के जागा सोडण्याचा निर्णय घेऊन बिल्डरांचा कसा फायदा करून ,दिला हे स्पष्ट करणार आहोत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

इतर बातम्या :

मोठी बातमी ! देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट, 6 संशयित ताब्यात, महाराष्ट्रही टार्गेटवर !

Fact Check: खरंच तरुणानं गर्लफ्रेंड पटत नाही म्हणून आमदाराला पत्रं लिहिलं? वाचा नेमकं काय प्रकरण आहे?

ऊर्जा विभागाला तारण्यासाठी ‘गुजरात मॉडेल’चा आधार घेणार?, आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीही नेमणार; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय

(all non marathi people parprantiya are not criminals said chandrakant patil criticizes uddhav thackeray)