AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain : पुन्हा पावसाचा तडाखा बसणार, आयएमडीने कुठे दिले रेड अलर्ट

weather update and rain : राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील धरणांमध्ये साठा पुरेसा नाही. दुसरीकडे आयएमडीने देशातील काही भागांत आजही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

Rain : पुन्हा पावसाचा तडाखा बसणार, आयएमडीने कुठे दिले रेड अलर्ट
| Updated on: Jul 10, 2023 | 11:36 AM
Share

योगेश बोरसे, पुणे : देशभरात मान्सूनचा जोर चांगलाच सुरु आहे. मुसळधार पावसामुळे दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि चंदीगडमध्ये हाहा:कार माजला आहे. नवी दिल्लीत पावसाचा ४० वर्षांचा विक्रम तुटला आहे. यामुळे शाळा महाविद्यालयांना सुटी दिली आहे. आता पुन्हा उत्तर भारतात पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने हिमाचल प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे हिमाचलमध्ये पुन्हा पावसाचे संकट असणार आहे.

मनाली चंदीगड हायवे बंद

हिमाचल प्रदेशात सुरु असलेल्या पावसामुळे मनाली चंदीगड महामार्ग बंद झाला आहे. हिमाचल प्रदेशात 13 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तराखंड राज्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे उत्तराखंड राज्यातील शाळा कॉलेज पाच दिवस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी पावसाने विश्रांती घेतली. सकाळपासून राजधानी दिल्लीत पावसाची हजेरी नाही.

नवी दिल्लीत रस्त्यांवर साचलेले पाणी

राज्यात २९% पाणीसाठा

राज्यात मान्सून स्थिरावला आहे. परंतु अद्यापही धरणातील पाणीसाठा पुरेसा झालेला नाही. राज्यातील धरणक्षेत्र अजूनही कोरडेच आहे. राज्यातील धरणांमध्ये केवळ २९% पाणीसाठा आहे. राज्यातील २४ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. सर्वात कमी पाणीसाठा पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १७.६६ टक्के साठा आहे. विदर्भात पाऊस नसताना नागपूरमधील पाणीसाठा मात्र सर्वाधिक आहे. नागपूरमध्ये ४९ टक्क्यांपर्यंत जलसाठा पोहोचला आहे. सर्वाधिक भिस्त असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा ही १५.६५ टक्क्यांवर आहे.

नवी दिल्लीत रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे रिक्षाचालकांची अशी परिस्थिती होत आहे

लहान धरणांमध्ये कशी आहे परिस्थिती

राज्यात लहान मोठी २ हजार ९८९ धरणे आहेत. या धरणांमध्ये रविवारपर्यंत २९.१५ टक्के पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. राज्यात अजून समाधानकारक पाऊस झाला नसल्याने कोकणातल्या भातशेतीची वेळापत्रक १५ दिवस पुढे गेलंय.

कोकणात अजून पावसाची गरज

कोकणात जून महिन्यात अवघा ३० टक्केच पाऊस झालाय. १ जूनपासून आजपर्यत 900 मिलिमिटर सरासरी पाऊस झालाय. परंतु आता कोकणातील धबधबे प्रवाहित झाले आहे. राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण इथला सवतकडा धबधबा प्रवाहित झाला आहे. यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून वर्षापर्यटनासाठी पर्यटक कोकणात येत आहे.

भंडारा जिल्ह्यात धरणाचे दरवाजे उघडले

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडले आहे. या धरणाचे 21 गेट अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे 81 हजार 620 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.