AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain : राज्यात पाच दिवस मुसळधार, आयएमडीचे नवीन अपडेट

Monsoon and Rain : राज्यातील अनेक भागांत पाऊस सुरु आहे. कुठे मुसळधार तर कुठे रिमझिम पाऊस सुरु आहे. मुंबई, पुणे शहरांत चार दिवसांपासून पाऊस सुरु आहे. यामुळे या ठिकाणी सूर्यदर्शनसुद्धा चार दिवसांपासून नाही.

Rain : राज्यात पाच दिवस मुसळधार, आयएमडीचे नवीन अपडेट
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 30, 2023 | 4:44 PM
Share

पुणे : राज्यात उशिराने आलेला मान्सून आता स्थिरावला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पाऊस सुरु आहे. या पावसानंतर शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग दिला आहे. मुंबई अन् पुणे शहरामध्ये पावसाची संततधार सुरु आहे. आधी बिपरजॉय चक्रीवादळाने मान्सूनला रोखून धरले होते. परंतु वादळ शांत होताच आता मान्सूनने चांगलाच वेग पकडला आहे. पुणे हवामान विभागाने पावसासंदर्भात महत्वाचे अपडेट दिले आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस मान्सून कसा असणार? याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

काय आहे अलर्ट

राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा प्रभाव असणार आहे. काही भागांत मुसळधार ते काही ठिकाणी अतीमुसळधार पाऊस पडणार आहे. यासंदर्भात काही भागांत ठिकाणी यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यात चांगला पाऊस होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

मुंबईत जोरदार, अंधेरी भुयारी मार्ग बंद

मुंबईत शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसानंतर अंधेरी भुयारी मार्ग पुन्हा एकदा काही काळासाठी बंद करण्यात आला. अंधेरी परिसरात सध्या पाऊस कमी झाला आहे. भुयारी मार्गातील पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच मुसळधार पावसानंतर अंधेरी एसव्ही रोडवरही पाणी साचल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसाला उशीर, भाजीपाला कडाडला

राज्यात यंदा मान्सून २५ जून रोजी दाखल झाला. दरवर्षी ७ जून रोजी दाखल होणारा मान्सून उशिराने आला. आता गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार सुरु आहे. यामुळे भाजीपाला निघत नाही. आवक कमी अन् मागणी जास्त झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले आहे. कधी शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकावा लागणारा टोमॅटो आता चांगलाच महाग झाला आहे. किरकोळ विक्री दर अनेक ठिकाणी 120 रुपये किलोवर गेला आहे.

धरणसाठ्यात अद्याप वाढ नाही

पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पात 36 टक्के जलसाठा आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील धरणांनाही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा पाणी प्रकल्पाने गाठली मृत साठ्याची पातळी गाठली आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणात 43 टक्के जलसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पाणी प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे.

Follow Us
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदींकडून इटलीच्या PMला खास..
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदींकडून इटलीच्या PMला खास...
महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? आव्हाडांनी आकडाच सांगितला
महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? आव्हाडांनी आकडाच सांगितला.
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं.
तटकरेंवर खरातचा दाबाव होता की... राष्ट्रवादीतील नेत्याचा मोठा दावा...
तटकरेंवर खरातचा दाबाव होता की... राष्ट्रवादीतील नेत्याचा मोठा दावा....
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच...
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच....
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर.
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या....
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या.....
राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या...
राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या....
परभणीत भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
परभणीत भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू.
नाशिक विधान परिषद जागेवर महायुतीतच चुरस; भाजप-शिंदे सेना आमनेसामने
नाशिक विधान परिषद जागेवर महायुतीतच चुरस; भाजप-शिंदे सेना आमनेसामने.