AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : काही ठिकाणी तापमानवाढीतून दिलासा तर काही ठिकाणी उष्णतेची लाट

Maharashtra Temperature : राज्यात तापमान वाढीतून काही ठिकाणी दिलासा मिळाला आहे. परंतु विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्मघाताचा त्रास जाणवू लागला आहे.

Weather Update : काही ठिकाणी तापमानवाढीतून दिलासा तर काही ठिकाणी उष्णतेची लाट
Heat wave
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 14, 2023 | 9:17 AM
Share

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात तापमान वाढीमुळे नागरीक हैराण झाले आहेत. उष्माघातामुळे राज्यात मृत्यू होऊ लागला आहे. उष्माघातासाठी शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील तापमान ४४ ते ४५ अंशांवर गेले आहे. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात दिलासा मिळाला आहे. पुणे वेधशाळेने राज्यातील काही भागांत heat wave असणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान मोचा चक्रीवादळ तीव्र झाले असून त्यामुळे काही राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे.

मोचाचा प्रभाव, पाऊस पडणार

बंगालचा उपसागरात मोचा वादळ सक्रीय झाले आहे. हे वादळ तीव्र झाल्यामुळे ईशान्य भारतात आजपासून 16 मे पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्रिपुरा आणि मिझोराममध्ये वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 14 आणि 15 मे रोजी नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसाममध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. आसाम आणि अरुणाचल प्रदेशात 14 ते 16 मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.

पुण्यात दिलासा पण…

वाढत्या उष्णतेपासून पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शनिवारी शहराचे तापमान केवळ 38 अंश सेल्सिअस होते. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराचा पारा 40 वर्षाच्या वर गेलेला पाहायला मिळाला होते. मात्र काल दिवसभरात शहरात तापमानात घट झाली आहे. पुणे शहरात आजपासून मात्र उष्णतेची मोठी लाट येईल, असा अंदाज पुणे हवामान वेधशाळेने व्यक्त केला आहे.

परभणीत उन्हाच्या झळा

परभणी जिल्ह्यात तापमानाने कहर केला असून, एकाच दिवसात तापमान 41 वरून 43 अंशावर वर गेल्याने गर्मीचा जोरदार तडाखा नागरिकांना बसत आहे. गेल्या तीन- चार दिवसांपासून परभणीकरांना उन्हाचे जोरदार चटके बसत आहे. परभणीत 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यात आठवडाभरापासून तापमान 40° च्या पुढे गेले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नवी मुंबईत तापमान ४० वर

नवी मुंबईत आता कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. नवी मुंबईत तापमान ४० अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतो. अनियंत्रित बांधकामे, नवीन प्रकल्प, सिमेंट-काँक्रिटीकरण, विमानतळ विकास, औद्योगिकीकरण आणि पदोपदी तयार होत असलेले सिमेंटचे जंगल या कारणांमुळे मुंबईपेक्षा नवी मुंबईतील तापमान कमीत कमी दोन ते चार अंश सेल्सिअसने जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे. सायंकाळी आणि रात्रीदेखील हवा गरम असते. त्यामुळे यंदाचा उकाडा नवी मुंबईकरांना त्रासदायक ठरत आहे. ताप, घसादुखी, पोटदुखीचा त्रास होणारे रुग्ण वाढल्याचे समोर येत आहे

Maharashtra temperature on 13 May 2023
शहर तापमान
जळगाव 44.9
अकोला 44.5
मुंबई 35.2
पुणे 40.8
नागपूर 42
नाशिक 39.7

अशी घ्या काळजी

उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीची मदत करिता संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये तातडीने हलवावे. शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यांवर थंड पाण्याचा मारा करावा. शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा. शरीराचे तापमान १०४ फेरहाईटपर्यंत किंवा ४० डिग्री सेल्सिअस पोचल्यास तीव्र डोकेदुखी, स्नायूचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे,लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, कुठूनही रक्तस्त्राव होणे तोंडाच्या जवळील त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसून येत आहे. यामुळे शारीरिक स्वास्थाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.‌ ही लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Follow Us
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी