AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

22 April 2023 Maharashtra Temperature : राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज, आता तापमान वाढीतून सुटका मिळणार का?

22 April 2023 Maharashtra City-Wise Temperature / Heat Wave Today News : राज्यातील अनेक शहरांमधील तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. एकीकडी तापमान ४० अंश सेल्सियसवर गेले असताना दुसरीकडे आयएमडीने पुढील चार दिवस राज्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

22 April 2023 Maharashtra Temperature : राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज, आता तापमान वाढीतून सुटका मिळणार का?
| Updated on: Apr 25, 2023 | 1:34 PM
Share

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात तापमान वाढीमुळे नागरीक हैराण झाले आहेत. वातावरणातील बदलामुळे कधी कुठे पाऊस पडत आहे तर कधी ऊन प्रचंड तापले आहे. उष्माघातासाठी शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेने राज्यातील काही भागांत heat wave तर कुठे पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अवकाळी पावसापासून अजूनही शेतकऱ्यांची सुटका नाही, हे स्पष्ट झाले आहे.

काय आहे अंदाज

येत्या तीन-चार दिवस राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटीसह अवकाळी पाऊस पडणार आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस व गारपीट २२ ते २५ एप्रिल रोजी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २४ व २५ एप्रिल रोजी पाऊस पडणार आहे.

कसे आहे तापमान

राज्यातील काही शहरांचे तापमान ४० अंश सेल्सियसवर गेले आहे. राज्यात चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सियस होते. जळगाव, अकोला, अमरावतीचे तापमान ४० अंश सेल्सियसवर गेले आहे. पुणे आणि मुंबईचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या आत आहे.

Maharashtra temperature on 21 th April 2023
शहर तापमान
जळगाव ४१.७
अकोला ४०.५
मुंबई ३७.३
पुणे ३८.४
नागपूर ३९.५
नाशिक ३६.६

ही काम कराच

उष्णतेच्या वाढत्या त्रासामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाच्या सुचना देण्यात आल्या आहेत.‌ शरीराचे तापमान वाढलेले, बेशुद्ध झालेली, गोंधळलेली, सतत घाम येत असलेली व्यक्ती थांबलेली दिसल्यास त्वरित १०२/१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य केंद्रांकडून केले आहे.

अशी घ्या काळजी

उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीची मदत करिता संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये तातडीने हलवावे. शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यांवर थंड पाण्याचा मारा करावा. शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा. शरीराचे तापमान १०४ फेरहाईटपर्यंत किंवा ४० डिग्री सेल्सिअस पोचल्यास तीव्र डोकेदुखी, स्नायूचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे,लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, कुठूनही रक्तस्त्राव होणे तोंडाच्या जवळील त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसून येत आहे. यामुळे शारीरिक स्वास्थाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.‌ ही लक्षणे दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हे टाळा

उन्हाच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. विशेषतः दुपारी बारा ते तीन या वेळेत घराबाहेर जाऊ नये. सैलसर व सुती कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी रुमाल किंवा छत्री वापरावी. दुपारी १२ ते ४ या वेळात घरात राहावे. थेट येणाऱ्या सूर्यप्रकाशाला उन्हाला अडवावे. पुरेसे पाणी प्या, ताक, लिंबू पाणी नारळ पाणी असे द्रव्य पदार्थ घ्या.

हे ही वाचा

Video : तापमान वाढले अन् मुंबईतील AC लोकलची अशी कशी झाली अवस्था

Video | उन्हामुळे हैराण झालेल्या युवकाची भन्नाट आयडीया झाली व्हायरल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.