AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’, अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे मागणी

पुणे अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, विनापरवानगी पोर्शे वाहन वितरीत करण्याऱ्या वितरकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे केली आहे.

'विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा', अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे मागणी
अंबादास दानवे यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 21, 2024 | 8:09 PM
Share

“पुणे अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच विनापरवानगी पोर्शे वाहन वितरीत करण्याऱ्या वितरकावर कडक कारवाई करावी”, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पुणे शहरातील कल्याणीनगर भागातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने 19 मे ला पहाटे उशिरापर्यंत पार्टी करून मद्यधुंद अवस्थेत एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्ता या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. यामध्ये अग्रवाल यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला वाहन परवाना नसतानाही वाहन चालविण्यास दिल्याने दोन निरापराध व्यक्तींचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे यासाठी जबाबदार असलेल्या विशाल अग्रवाल यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.

सदरचे पोर्शे वाहन हे परराज्यातून आणले असून त्याची नोंदणी झालेली नाही. तसेच वाहन क्रमांक देखील देण्यात आलेला नाही. वाहनाचा वाहनकर सुद्ध भरण्यात आलेले नाही. तरी देखील २- ३ महिन्यांपासून सदरचे वाहन वापरात होते या वाहनावर संबंधित परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेवर कारवाई केली असती तर ही दुर्दैवी घटना टळली असती. त्यामुळे यासाठी जबाबदार असलेल्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यावरही नियमानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

‘त्या’ पबवर कडक कारवाई करून परवाने रद्द करण्याची मागणी

अल्पवयीन मुलांना मद्यपान पुरविणाऱ्या पबवर कडक कारवाई करून परवाने रद्द करावे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. “ज्या पबमध्ये अल्पवयीन मुलाने पार्टी करून मद्यपान केले अशा कोझी पबमध्ये आणि ब्लॅक पबमध्ये नियमांचे उल्लंघन करून अल्पवयीन मुलांना मद्य दिले जाते. त्यामुळे या पबवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच, पुणे शहरात मोठया प्रमाणात महाविद्यालयीन मुले पबमध्ये जात असून ते अल्पवयीन आहेत की नाही याची तपासणी केली जात नाही. त्यामुळे अशा सर्व पबची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या पुणे शहरातील सर्व पब आणि बारवर कारवाई करुन पबचे परवाने रद्द करण्यात यावेत”, अशीदेखील मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

“पोर्शे कंपनीच्या वितरकाने विना नोंदणी आणि विना क्रमांक वाहन ग्राहकाला वापरण्यात दिले आहे. सदरची बाब गंभीर असून याची चौकशीही करण्यात यावी. अल्पवयीन मुलाला येरवडा पोलिस ठाण्यात व्ही. आय. पी. वागणूक देवून घाईघाईने त्याला जामीन मिळण्यास मदत केल्याची चर्चा आहे.त्यामुळे यासंबंधी दोषी अधिकाऱ्यावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देखील कारवाई तातडीने करण्यात यावी”, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. तसेच यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याबाबत शासनाने पावले उचलावीत, अशी सूचना दानवे यांनी उपरोक्त पत्रात केली आहे.

Follow Us
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...