AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप शेवटचे हातपाय हलवतोय, सत्ता जाणार; काँग्रेस नेत्याचा सर्वात मोठा दावा

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दावा केला आहे की भाजप राहुल गांधींना घाबरले आहे, म्हणूनच त्यांच्या कार्यक्रमांना विरोध करत आहे. भाजप महाराष्ट्रात सत्ता गमावणार आहे कारण लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. राहुल गांधी युवकांचे प्रेरणास्थान असून, भाजप आता शेवटचे हातपाय हलवत आहे. पटोले यांनी भाजपवर हुकूमशाहीचा आरोप करत, त्यांची सत्ता लवकरच संपुष्टात येईल असे म्हटले आहे.

भाजप शेवटचे हातपाय हलवतोय, सत्ता जाणार; काँग्रेस नेत्याचा सर्वात मोठा दावा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 22, 2026 | 11:31 AM
Share

भाजपचे लोक राहुल गांधींना घाबरत आहेत. त्यांच्या मनात राहुल गांधींबद्दलची भीती आहे. त्यामुळेच ते राहुल गांधी यांच्या कार्यक्रमांना विरोध करत आहेत. तीन राज्यात पाहिलं. आता महाराष्ट्रातही तेच घडत आहे. खरे तर भाजपची सत्ता जाणार आहे. लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही हे त्यांना कळून चुकलं आहे. त्यामुळेच भाजपचे लोक शेवटचे हातपाय हलवण्याचं काम करत आहे, असा दावा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना पटोले यांनी हा दावा केला आहे.

काल एनएसयूच्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. याचा अर्थ भाजपवाले राहुल गांधींना घाबरले आहेत. कार्यक्रमाला गालबोट लावण्याचं काम सुरू आहे. भाजपच्या मनात भयभीतपणा दिसत आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. या अन्यायाविरोधात राहुल गांधींनी रणशिंग पुकारलं आहे. राहुल गांधींच्या सोबत तरुण आहेत, असं सांगतानाच भाजप शेवटचे हातपाय हलवत आहे. भाजपचं सरकार जाणार आहे. लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे, हे भाजपला कळून चुकलं आहे. भाजप सत्तेत राहिल्यावर देशाची संवैधानिक व्यवस्था संपुष्टात येईल असं तरुणांना आणि शेतकऱ्यांना वाटत आहे. भाजपबद्दलची चीड लोकांच्या मनात आहे, असं नाना पटोले म्हणाले.

राहुल गांधी युवकांचे प्रेरणास्थान

राहुल गांधी हे माझेच नेते आहेत असं नाही. ते देशाचे नेते आहेत. राहुल गांधी युवकांचे प्रेरणास्थान झाले आहेत. राहुल गांधी ज्या ज्या राज्यात छात्रो की गुंज कार्यक्रम करतात तिथे भाजपच्या सत्ताधीशांना त्रास होतोय. तीन राज्यात हेच झालं. हे चौथं राज्य आहे. महाराष्ट्र हे समाजिक न्यायाचं राज्य आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचं राज्य आहे. इथूनच स्त्री शिक्षणाला सुरवात झाली. महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणाचे द्वारे उघडण्याचं काम याच पुण्यातून केलं. त्याच पुण्यात राहुल गांधींचा कार्यक्रम फेल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं पटोले यांनी म्हटलं.

भाजप राहुल गांधींना घाबरली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमाला परमिशन देताना 30 नियम लावले. आधी जमावबंदी लावली. यावरून भाजपला राहुल गांधींची भीती वाटते हे स्पष्ट होतंय. राहुल गांधींना भाजप घाबरली आहे. अमित शाह महिन्यातून दोनदा महाराष्ट्रात येतात. त्यांना अटी लागत नाही. मोदींच्या कार्यक्रमाला अटी लागत नाही. जमावबंदी लागू होत नाही. आणि राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते असूनही त्यांच्या कार्यक्रमाला अटी लावल्या जातात. याचाच अर्थ भाजप त्यांना किती घाबरते हे दिसतंय, असं ते म्हणाले.

ही हुकूमशाही आहे

पुण्यात विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यावरही पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुलांचं आयुष्य बरबाद करणं, काही मुलं कोणत्याच पक्षाचे नव्हते. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. अभाविपच्या लोकांवर गुन्हे दाखल केले नाही. ही हुकूमशाही आहे. जेपी नड्डांना सांगायचं जंतरमंतरवर मुलांवर पॅलेट गन चालवल्या त्याचं उत्तर का देत नाही? राहुल गांधींनी जे प्रश्न विचारले त्यावर का बोलत नाही? मोदी शाह संसदेत का येत नाहीत? भाजपचे नेते भीती युक्त स्टेटमेंट करत आहेत. राहुल गांधी यांच्याबद्दलची भीती मनात आहे. सत्ता जातेय असं वाटतंय त्यांना. लोकं आपल्या विरोधात जातेय हे त्यांना कळलंय. म्हणून ते असं करत आहेत, असा दावा त्यांनी केला.

दूध का दूध, पानी का पानी होईल

राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला पैसे देऊन तरुणांना आणलं जात असल्याचा भाजपने आरोप केला. भाजपचा हा आरोप पटोले यांनी फेटाळून लावला आहे. पैसे देऊन लोकं जमा करायचे हे भाजपचं पेटंट आहे. मोदी शाह यांच्या सभेत तेच केलं जातं. जेवणाची व्यवस्था केली जाते, पैसे दिले जातात. त्यांना ती सवय लागली. त्यांची सवय हे काँग्रेसवर टाकू पाहत आहेत. आज कार्यक्रम आहे. जेनजी येणार आहेत. त्यांना विचारा. पैसे देऊन आला की स्वत:हून आला. दूध का दूध पानी का पानी होईल, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
शानदार लाइटिंग, मोठमोठे बॅनर अन्... राहुल गांधींच्या मोहिमेची तयारी
Rahul Gandhi | शानदार लाइटिंग, मोठमोठे बॅनर अन्... पुण्यात राहुल गांधींच्या 'छात्रो की गूंज' मोहिमेची समर्थकांकडून जय्यत तयारी
भाजपच्या पायाखालील वाळु सरकलेय, आता सप्टेंबरपासून पडझड...
भाजपच्या पायाखालीची वाळु सरकलेय, आता सप्टेंबरपासून पडझड... संजय राऊतांचं अजब भाकित
ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचा सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश,
ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचा सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश, नितेश राणेंनी दिला धक्का
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचं जात प्रमाणपत्र अचानक रद्द
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचं जात प्रमाणपत्र अचानक  रद्द, पदावर टांगती तलवार
धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
Omraje Nimbalkar : धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.