AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune rain politics : मुसळधार पावसानंतर पुण्यातलं राजकीय वातावरण तापलं, भाजपा-राष्ट्रवादी आमनेसामने

पावसामुळे पुणेकरांना जो त्रास झाला त्याला सर्वस्व महापालिकेत असणारे तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे (BJP) सरकार कारणीभूत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. मात्र राष्ट्रवादीच्या या आरोपाला भाजपानेदेखील प्रत्युत्तर दिलेले पाहायला मिळत आहे.

Pune rain politics : मुसळधार पावसानंतर पुण्यातलं राजकीय वातावरण तापलं, भाजपा-राष्ट्रवादी आमनेसामने
प्रदीप देशमुख/जगदीश मुळीकImage Credit source: tv9
| Updated on: Sep 12, 2022 | 1:27 PM
Share

पुणे : मुसळधार पावसानंतर पुणेकरांना झालेल्या त्रासाला सर्वस्वी भाजपा जबाबदार आहे, असा आरोप राष्ट्रवादीने (NCP) केला आहे. पुण्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली होती. शहरात अनेक ठिकाणी गुडघ्यावर पाणी साचले होते. यामुळे पुणेकरांची गैरसोय झाली होती. शहरातील अनेक भागातील घरांमध्येदेखील पावसाचे पाणी (Heavy rain) घुसले होते. पण आता यावरून पुणे शहरात राजकारणदेखील तापलेले दिसून येत आहे. काल झालेल्या पावसामुळे पुणेकरांना जो त्रास झाला त्याला सर्वस्व महापालिकेत असणारे तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे (BJP) सरकार कारणीभूत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. मात्र राष्ट्रवादीच्या या आरोपाला भाजपानेदेखील प्रत्युत्तर दिलेले पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी भाजपावर जोरदार हल्ला केला तर भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पलटवार केला आहे.

‘प्रशासनाची मनमानी’

ज्या पक्षाचे लक्ष फक्त टेंडरवर असते, अशा भाजपाला पुणेकरांनी निवडून दिले. 99 नगरसेवकांनी काय केले, हे पाहून पुणेकर डोक्याला हात लावत आहे. मागील पावसामध्ये रस्त्याची पूर्णत: चाळण झाली होती. एकही रस्ता असा नव्हता, जिथे खड्डा नाही. तर कालच्या पावसात या सगळ्यांची परिसीमा झाली. पुणेकरांना ही संध्याकाळ विसरता येणार नाही. टेंडरची मलई खाणारे नागरिकांच्या प्रश्नांची कधीच उत्तरे देणार नाहीत. दुसरीकडे जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने प्रशासन मनमानी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केला आहे.

‘मुलभूत सुविधाही पुरवल्या नाहीत’

भाजपाने राष्ट्रवादीच्या या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. काल झालेल्या परिस्थितीला पूर्णतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचा पलटवार भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे. जेव्हापासून शहरात महापालिका अस्तित्वात आली, तेव्हापासून महापालिकेवर यांची सत्ता होती. त्यावेळेला त्यांनी शहरासाठी कुठले आणि काय नियोजन केले, असा सवाल मुळीक यांनी राष्ट्रवादीला विचारला आहे. मुलभूत सुविधाही पुरवल्या नाहीत. नालेसफाई यांच्या काळात नीट झाली नाही. पुढील 50 वर्षांचा विचार सत्ता असताना करायचा असतो, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने काहीही केले नाही, असे मुळीक म्हणाले.

Follow Us
एनआर काँग्रेस 8 जागी आघाडीवर; तीन राज्यांत सत्ताबदलाचे संकेत?
एनआर काँग्रेस 8 जागी आघाडीवर; तीन राज्यांत सत्ताबदलाचे संकेत?.
करुणा मुंडे यांना किती मिळाली मते? चकित करणारी आकडेवारी समोर
करुणा मुंडे यांना किती मिळाली मते? चकित करणारी आकडेवारी समोर.
तमिळनाडूत राजकीय उलथापालथ; टीव्हीके सर्वात मोठा पक्ष, डीएमकेला धक्का
तमिळनाडूत राजकीय उलथापालथ; टीव्हीके सर्वात मोठा पक्ष, डीएमकेला धक्का.
मोठी बातमी! कलांनुसार आघाडीवर असताना सुनेत्रा पवारांचा कार्यकर्त्यांना
मोठी बातमी! कलांनुसार आघाडीवर असताना सुनेत्रा पवारांचा कार्यकर्त्यांना.
तमिळनाडूत मोठा राजकीय धक्का; विजयच्या टीव्हीकेची आघाडी, डीएमके.....
तमिळनाडूत मोठा राजकीय धक्का; विजयच्या टीव्हीकेची आघाडी, डीएमके......
प.बंगालमध्ये भाजपा 24 जागांवर पुढे तर टीएमसी...सुरुवातीच्या कलांमध्ये
प.बंगालमध्ये भाजपा 24 जागांवर पुढे तर टीएमसी...सुरुवातीच्या कलांमध्ये.
बारामतीत सुनेत्रा पवारांचा झंझावात तर राहुरीत कर्डिलेची भक्कम आघाडी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा झंझावात तर राहुरीत कर्डिलेची भक्कम आघाडी.
तामिळनाडूत विजय यांच्या नव्या पक्षाचा उदय होणार?
तामिळनाडूत विजय यांच्या नव्या पक्षाचा उदय होणार?.
पोटनिवडणुकीत आघाडीचे चित्र स्पष्ट; बारामती-राहुरीत पुढे कोण?
पोटनिवडणुकीत आघाडीचे चित्र स्पष्ट; बारामती-राहुरीत पुढे कोण?.
पहिल्या कलांमध्ये भाजप आघाडीवर, टीएमसीची जोरदार लढत
पहिल्या कलांमध्ये भाजप आघाडीवर, टीएमसीची जोरदार लढत.