AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RTE Admission : आरटीई प्रवेशाची महत्वाची बातमी, १५ मे पर्यंतच प्रवेश घ्या, अन्यथा

RTE Admission 2023- 24 : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यात प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. यासाठी शासनाने नवीन आदेश काढले आहेत. शालेय शिक्षण विभागाने प्रवेशासंदर्भात १५ मे ही तारीख निश्चित केली आहे.

RTE Admission : आरटीई प्रवेशाची महत्वाची बातमी, १५ मे पर्यंतच प्रवेश घ्या, अन्यथा
आरटीई प्रवेशाला सुरुवात, शेवटची तारीख कधी, पाहा तुमच्या मुलाचा नंबर कसा चेक करणार? जाणून घ्या
| Updated on: May 10, 2023 | 8:31 AM
Share

अभिजित पोते, पुणे : शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RTE च्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत निघाली. त्यानंतर शाळा प्रवेश सुरु झाली आहे. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप झाले नाही. ही प्रवेश प्रक्रिया संथगतीने सुरु आहे. आरटीई अंतर्गत असलेल्या 25 टक्के राखीव जागांसाठी मुदत वाढवण्याची मागणी होत आहे. परंतु शासनाने त्यास नकार दिला आहे. यामुळे १५ मे पर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे. यामुळे पालकांनी सर्व कामे सोडून आधी प्रवेश निश्चित करणे गरजेचे झाले आहे.

किती प्रवेश रखडले

शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांचे प्रवेश सुरु आहे. हे प्रवेश अंत्यत धीम्या गतीने सुरु आहे. राज्यात ४० हजार तर पुण्यात ६ हजार प्रवेश रखडले आहे. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांपैकी मंगळवार (ता.९) पर्यंत केवळ ५४ हजार विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले आहे. म्हणजेच ४० हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले असून त्यासाठी फक्त १५ मे पर्यंत मुदत आहे.

मुदत वाढवण्यास नकार

शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीई प्रवेशाची प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे. त्यासाठी दिलेली मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे. परंतु १५ मे ही शेवटची मुदत असेल, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे पालकांना आपली सर्व कामे सोडून आधी प्रवेश निश्चित करावे लागणार आहे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी रहिवाशी दाखला, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला( खुल्या प्रवर्गासाठी), जन्माचा दाखला, अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेअंतर्गत प्रवेश दिला जातो.

पुणे जिल्ह्यातून यंदा सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावं लागणार आहे. प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळवली जाणार आहे.प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीमध्ये पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश निश्चित करावा, असेही आवाहन संचालनालयाने केले आहे.

5 एप्रिल 2023 रोजी लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची नावं जाहीर झाल्यानंतर 12 एप्रिल 2023 रोजी आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तसेच निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईलवर एसएमएस प्राप्त झाला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.