AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News | विद्यार्थ्यांच्या निकालात चुका, प्रथमच केली गेली अनेक प्राध्यापकांवर कारवाई

Pune Education News | विद्यार्थ्यांचा निकाल लावताना अनेक वेळा शिक्षक, प्राध्यापकांकडून चुका केल्या जातात. कधी प्रश्न न तपासणे तर कधी गुणांची बेरीज बरोबर नसते. आता हा हलगर्जीपणा प्राध्यापकांना चांगलाच भोवला आहे.

Pune News | विद्यार्थ्यांच्या निकालात चुका, प्रथमच केली गेली अनेक प्राध्यापकांवर कारवाई
Pune-UniversityImage Credit source: socialmedia
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 05, 2023 | 8:36 AM
Share

अभिजित पोते, पुणे | 5 ऑक्टोंबर 2023 : वर्षभर अभ्यास करुन विद्यार्थी परीक्षा देतो. परंतु अनेक वेळा निकाल चुकीची लागतो. यामुळे विद्यार्थी पुन्हा शुल्क भरुन पेपरच्या पुनर्तपासणीचा अर्ज करतो. त्यात प्राध्यपकांकडून झालेला घोळ स्पष्ट होता. आता पेपर तपासणी करताना केलेल्या चुकांसंदर्भात विद्यापीठाने कठोर भूमिका घेतली आहे. पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्राध्यापक आणि महाविद्यालयांवर कारवाई करण्यात आली. प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने प्राध्यापकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.

किती महाविद्यालयांवर कारवाई

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने निकाल चुकविणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई सुरु केली आहे. विद्यापीठाने ७८ महाविद्यालयांना दंड केला आहे. विद्यार्थ्यांचे निकाल चुकवणाऱ्या प्राध्यापक आणि महाविद्यालयांवर प्रथमच कारवाई करण्यात आलेली आहे. विद्यापीठाकडून एप्रिल- मे २०२३ या सत्रातील परीक्षांचे निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यात अनेक विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण भरण्याचे राहून गेल्याचे समोर आले. तसेच काही जणांनी चुकीचे गुण दिले. तर काहींकडून गुण भरण्यात त्रुटी राहून गेल्या. त्यामुळे विद्यापीठाच्या समितीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी सुनावणी घेऊन संबंधित प्राध्यापकांवर कारवाई करण्यात आली.

किती रुपयांचा केला दंड

विविध विषयांच्या परीक्षांचे अंतर्गत गुण आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण देतानाही प्राध्यापकांनी चुका केल्याचे चौकशी समितीला दिसून आले. त्यानंतर विद्यापीठाच्या समितीने ७८ महाविद्यालयातील प्राध्यापकांना पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड केला आहे. विद्यापीठाच्या समितीने दिलेल्या शिक्षेची महाविद्यालयाने योग्य ती पूर्तता करावी. तसेच यासंदर्भातील कार्यवाहीचा पूर्तता अहवाल परीक्षा विभागास सादर करावा, असे आदेश विद्यापीठाने दिले आहे. तसेच या पुढील काळात अशाच चुका केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

यादीच केली प्रसिद्ध

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ३० सप्टेंबर रोजी यासंदर्भातील यादीच प्रसिद्ध केली आहे. ३७ पानी परिपत्रक काढून परीक्षेच्या कामात चुका केलेल्या संबंधित महाविद्यालये आणि प्राध्यापकांची यादीच त्यात प्रसिद्ध केली आहे. या यादीत निकालात त्रुटी राहिल्या विद्यार्थ्यांची संख्या दिली आहे. विद्यापीठाने केलेल्या या कारवाईचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात