AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषद निवडणुकीचं गणित कुठं फसलं?; शरद पवारांनी उघडपणे सांगितलं

Sharad Pawar on Vidhanparishad Election 2024 : विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार, शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव का झाला? विधानपरिषदेच्या निवडणुकीचं गणित कुठं फसलं? पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी उघडपणे सांगितलं... वाचा सविस्तर...

विधानपरिषद निवडणुकीचं गणित कुठं फसलं?; शरद पवारांनी उघडपणे सांगितलं
शरद पवारImage Credit source: Facebook
| Updated on: Jul 17, 2024 | 1:12 PM
Share

नुकतंच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले. तर महाविकास आघाडीच्या मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव यांचा विजय झाला. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गट पुरस्कृत शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव का झाला? यावर शरद पवार यांनी भाष्य केलंय. जयंत पाटील यांच्यासोबत एकत्रित निर्णय झाला नव्हता. एकत्रित म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने उमेदवार ठरवण्याचा निर्णय झाला नव्हता. माझ्यापक्षाची १२ मते होती. आम्हाला शेकापला पाठिंबा द्यावा असं वाटलं, असं शरद पवार म्हणाले.

पवारांचं प्लॅनिंग काय होतं?

जयंत पाटील यांना पाठिंबा दिला. त्याला कारण होतं. लोकसभेच्या निवडणुकीत तिघे एकत्र लढलो. ती लढत असताना सीपीआय, सीपीएम, शेकाप येतात. त्यांना आम्हाला काही जागा मागितल्या. ते देण्याच्या स्थितीत नव्हतो. तेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि मी एकत्र बसलो. तेव्हा त्यांना सांगितलं की, डाव्यांना आता काही देऊ शकत नाही. पण विधान परिषद आणि विधानसभेत त्यांना मदत करू. सर्वांनी मान्य केलं. तिघे एकत्र लढलो. लोकसभेत यश मिळालं. मनात होतं की संधी आली तर जागांचा विचार करावा, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

काँग्रेसची मते जास्त होती. त्यांनी उमेदवार दिले. शिवसेनेकडे थोडी जास्त होती, पण पुरेशी नव्हती. त्यांनी उमेदवार झाली. त्यांची स्ट्रॅटेजी आहे. पण त्यात मतभिन्नता होती. काँग्रेसकडे ३७, आमच्याकडे १२ आणि शिवसेनेकडे १६ होती. काँग्रेसकडे जेवढी मते होती. त्यांनी दोन आणि एक नंबरचं मत कुणालाही देऊ नये असं मत होतं. निवडून येण्यासाठी सर्व मते तुम्ही घ्या, असं पवार म्हणाले.

पराभव का झाला?

दोन नंबरची मते ५० टक्के मते शेकाप आणि ठाकरे गटाला द्या. एक नंबरची मते अधिक होती आणि ही मते सर्व ट्रान्सफर होतील. तेवढी मते दोन नंबरला जातील. दोन नंबरच्यांनी पहिलं मत ठाकरेंना द्यावं. आणि ठाकरेच्या दोन नंबरने पहिलं मत शेकापला द्यायला हवं होतं. माझं गणित होतं. आमचे निवडून आले असते. हे गणित मान्य झालं नाही. त्यामुळे शेकापचे पाटील पडले. कुणी कुणाला फसवलं नाही. फक्त स्ट्रॅटेजीमुळे पडले, असं म्हणत पवारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पराभवाचं कारण सांगितलं.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.