AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीमध्ये पुन्हा मतमोजणी होणार? पराभूत झाल्यानंतर युगेंद्र पवार यांनी उचलले असे पाऊल

पुणे जिल्ह्यातून ११ उमेदवारांनी पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. त्यासाठी ६६ लाख रुपये भरले आहेत. यासंदर्भात बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत फक्त माझाच पराभव झाला असता तर मी अर्ज केला नसता. कारण बारामतीमध्ये कोणी उभे राहण्यासाठी तयार नव्हते.

बारामतीमध्ये पुन्हा मतमोजणी होणार? पराभूत झाल्यानंतर युगेंद्र पवार यांनी उचलले असे पाऊल
sharad pawar, ajit pawar and yugendra pawar
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 01, 2024 | 12:41 PM
Share

राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेची निवडणूक बारामतीची ठरली होती. बारामतीमध्ये लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पवार कुटुंबियांमध्ये लढत झाली. काका अजित पवार आणि पुतण्या युगेंद्र पवार यांची लढत चर्चेची ठरली. या लढतीत अजित पवार विजयी झाले. त्यानंतर काकाविरुद्ध पुतण्याने पुन्हा फेरमतमोजणीचा अर्ज दिला आहे. त्यासाठी लागणारी रक्कमसुद्धा भरली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये पाच टक्के ईव्हीएमची फेरमतमोजणी होणार आहे, असे युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

११ उमेदवारांचे पडताळणीसाठी अर्ज

पुणे जिल्ह्यातून ११ उमेदवारांनी पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. त्यासाठी ६६ लाख रुपये भरले आहेत. यासंदर्भात बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत फक्त माझाच पराभव झाला असता तर मी अर्ज केला नसता. कारण बारामतीमध्ये कोणी उभे राहण्यासाठी तयार नव्हते. आमच्या पुढची ताकद मोठी होती. आमच्या पुढे आव्हान मोठे होते. राज्याचे उपमुख्यमंत्री होते. परंतु आम्ही विचार सोडले नाही. त्यामुळे आम्ही लढलो.

पाच टक्के ईव्हीएम तपासायचा अधिकार

आम्ही पराभूत झालो असलो तरी बारामतीकरांसाठी आम्ही काम करत आलो आहे. यापुढेही करत राहू, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीबाबत अख्ख्या महाराष्ट्रात संशयाचे वातावरण आहे. दिग्गज नेते जे अनेक दशकांपासून निवडून येत आहेत, त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आम्ही पक्षाच्या बैठकीत यावर चर्चा केली. त्यानंतर आम्हाला सुप्रीम कोर्टाने 5 टक्के ईव्हीएम तपासायचा अधिकार दिला आहे. त्यानुसार आम्ही पडताळणीसाठी अर्ज करणार आहोत.

मतदार संघात आभार दौरे

युगेंद्र पवार यांचे मतदार संघात दौरे सुरु आहे. त्याबाबत ते म्हणाले, फक्त प्रचारासाठी जाणे आम्हाला पटत नाही. बारामतीमधील लोकांनी आम्हाला मतदान केले आहे. त्यामुळे गावागावांत जाऊन लोकांना भेटत आहोत. त्यांना विश्वास देत आहोत. त्यांचे आभार मानत आहोत. नेहमीसारखा हा आभार दौरा आहे. लोकसभेतही आम्ही हा दौरा केला होता. पवार साहेबांनी दिलेल्या शिकवण दिली आहे. बाबा आढाव आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले, बाबा खूप ज्येष्ठ आहेत. सगळ्यात जास्त अनुभव आहे. त्यांनी अनेक निवडणूका बघितल्या आहेत. त्यांना काहीतरी वाटत असेल त्यामुळे त्यांनी आंदोलन केले. आपल्याला ते गंभीरतेने घ्याव लागेल.

Follow Us
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् तिकडे एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, काय घडलं?
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् तिकडे एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, काय घडलं?
लावा रे तो ऑडियो... पहिल्याच दौऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; थेट...
लावा रे तो ऑडियो... पहिल्याच दौऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; थेट...
मी जनतेची माफी मागणार... उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
मी जनतेची माफी मागणार... उद्धव ठाकरे असं का म्हणाले?