AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आज बांधलेली वज्रमूठ त्यांनी एकमेकांवर वापरायची वेळ येऊ नये”; मविच्या सभेनंतर भाजप नेत्यानं ठाकरेंना डिवचले

उद्धव ठाकरे अडीच वर्षे घरात बसले होते, त्यानंतर त्यांना लोकांनी फेसबुकवर पाहिले आणि आता त्यांनी वज्रमूठ बांधली आहे असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

आज बांधलेली वज्रमूठ त्यांनी एकमेकांवर वापरायची वेळ येऊ नये; मविच्या सभेनंतर भाजप नेत्यानं ठाकरेंना डिवचले
| Updated on: Apr 02, 2023 | 11:05 PM
Share

पुणे : भाजपच्या हुकुमशाहीविरोधात आम्ही वज्रमूठ बांधली आहे असा इशारा देत छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. महाविकास आघाडीची ही पहिलीच संयुक्त सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी टीका करताना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रसरकारवरही त्यांनी सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर आता सत्ताधाऱ्यांननी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना कोरोना काळात घेतलेल्या ऑनलाईन बैठकावरून त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. टीका करताना ते म्हणाले की, दोन अडीच वर्षे उद्धव ठाकरे घरात बसले होते. त्यानंतर फेसबूकवर त्यांना लोकांनी पाहिलं आणि त्यांनी आता वज्रमूठ बांधली आहे.

मात्र सध्याच्या काळात त्यांन आता एकमेकांविरोधात त्यांनी ती वापरायची वेळ येऊ नये असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला.

उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली असली तरी त्यांच्याकडे आता स्वतंत्र अधिकार काही राहिले नाहीत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या प्रवाहात त्यांनी येवू नये असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातात काही राहिलं नसून त्यांचा रिमोट कंट्रोल वेगळा असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या मित्रपक्षावर निशाणा साधला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सावरकर यांच्यावरूनही भाजपवर टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी आम्हीच पहिल्यांदा केली होती.

मात्र आता भाजपकडून त्यांना भारतरत्न का दिला जात नाही असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबत आता ठराव झाला असून आता केंद्र सरकार निर्णय घेईल असंही त्यानी यावेळी सांगितले.

शिवसेनेची जी धुळदाण झाली आहे त्याचा आक्रोश आता फक्त उद्धव ठाकरे यांच्या कानात घुमतो आहे मात्र तो आता हिंदूंचा आक्रोश नाही अशी खोचक टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे अडीच वर्षे घरात बसले होते, त्यानंतर त्यांना लोकांनी फेसबुकवर पाहिले आणि आता त्यांनी वज्रमूठ बांधली आहे असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.