AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आज बांधलेली वज्रमूठ त्यांनी एकमेकांवर वापरायची वेळ येऊ नये”; मविच्या सभेनंतर भाजप नेत्यानं ठाकरेंना डिवचले

उद्धव ठाकरे अडीच वर्षे घरात बसले होते, त्यानंतर त्यांना लोकांनी फेसबुकवर पाहिले आणि आता त्यांनी वज्रमूठ बांधली आहे असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

आज बांधलेली वज्रमूठ त्यांनी एकमेकांवर वापरायची वेळ येऊ नये; मविच्या सभेनंतर भाजप नेत्यानं ठाकरेंना डिवचले
| Updated on: Apr 02, 2023 | 11:05 PM
Share

पुणे : भाजपच्या हुकुमशाहीविरोधात आम्ही वज्रमूठ बांधली आहे असा इशारा देत छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. महाविकास आघाडीची ही पहिलीच संयुक्त सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी टीका करताना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रसरकारवरही त्यांनी सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर आता सत्ताधाऱ्यांननी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना कोरोना काळात घेतलेल्या ऑनलाईन बैठकावरून त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. टीका करताना ते म्हणाले की, दोन अडीच वर्षे उद्धव ठाकरे घरात बसले होते. त्यानंतर फेसबूकवर त्यांना लोकांनी पाहिलं आणि त्यांनी आता वज्रमूठ बांधली आहे.

मात्र सध्याच्या काळात त्यांन आता एकमेकांविरोधात त्यांनी ती वापरायची वेळ येऊ नये असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला.

उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली असली तरी त्यांच्याकडे आता स्वतंत्र अधिकार काही राहिले नाहीत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या प्रवाहात त्यांनी येवू नये असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातात काही राहिलं नसून त्यांचा रिमोट कंट्रोल वेगळा असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या मित्रपक्षावर निशाणा साधला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सावरकर यांच्यावरूनही भाजपवर टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी आम्हीच पहिल्यांदा केली होती.

मात्र आता भाजपकडून त्यांना भारतरत्न का दिला जात नाही असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबत आता ठराव झाला असून आता केंद्र सरकार निर्णय घेईल असंही त्यानी यावेळी सांगितले.

शिवसेनेची जी धुळदाण झाली आहे त्याचा आक्रोश आता फक्त उद्धव ठाकरे यांच्या कानात घुमतो आहे मात्र तो आता हिंदूंचा आक्रोश नाही अशी खोचक टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे अडीच वर्षे घरात बसले होते, त्यानंतर त्यांना लोकांनी फेसबुकवर पाहिले आणि आता त्यांनी वज्रमूठ बांधली आहे असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

Follow Us
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम
पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेना; इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम.
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप
जालन्यातील अवैध गर्भपात प्रकरणात दानवेंचे भाजपवर आरोप.
आई दुसऱ्यांकडे धुणीभांडी करते, वडील वॉचमन; मुलागा झाला IPS अधिकारी
आई दुसऱ्यांकडे धुणीभांडी करते, वडील वॉचमन; मुलागा झाला IPS अधिकारी.
सिलेंडर रिफिल बुकिंगचे नियमात मोठा बदल! 25 दिवसांनीच करता येणार बुकिंग
सिलेंडर रिफिल बुकिंगचे नियमात मोठा बदल! 25 दिवसांनीच करता येणार बुकिंग.
नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय सिलेंडर नाही
नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय सिलेंडर नाही.
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह.