AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदाचा संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर पालखी प्रस्थान सोहळा कसा असेल?

सर्व वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलीय. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना वारीत प्रत्यक्ष हजर राहून दर्शन करता येणार नाहीये.

यंदाचा संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर पालखी प्रस्थान सोहळा कसा असेल?
आषाढी वारी, फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jun 30, 2021 | 5:45 PM
Share

पुणे : सर्व वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलीय. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना वारीत प्रत्यक्ष हजर राहून दर्शन करता येणार नाहीये. प्रातिनिधिक स्वरुपात मोजक्या वारकऱ्यांना वारीला परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे या वारकऱ्यांसह गुरुवारी (1 जुलै) देहूतून तुकाराम महाराज आणि आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होतंय. यंदाचा वारी सोहळा कसा असणार याविषयी अनेक भाविकांना उत्सुकता आहे. म्हणून त्यांच्यासाठी हा खास रिपोर्ट (Special report on Sant Dnyaneshwar and Tukaram Palakhi Sohala of Dehu Alandi wari).

पंढरपूरच्या आषाढी वारीला जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यापासून सुरुवात होते. प्रस्थान सोहळ्याच्या 3 दिवस आधीचं देहूनगरीत आणि आळंदीत लाखो वारकरी जमायला सुरुवात होते. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा यंदाचा 336 वा पालखी प्रस्थान सोहळा उद्या (1 जुलै) पार पडतोय, तर 2 जूलैला आळंदीतून ज्ञानेश्वरांच्या पालखीचं प्रस्थान होतंय, मात्र यंदा कोरोनामुळं राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली आणि बसनंच पालखी पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेतला.

एसटी महामंडळाच्या 8 शिवशाही बसेसमधून वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करणार

यानुसार एसटी महामंडळानं 8 शिवशाही बसेसंही उपलब्ध केल्यात. मात्र यंदा देहूतलं आणि आळंदीतलं चैतन्य मात्र हरवलंय. जिथं वारकरी श्नद्धेनं आपलं डोकं टेकवतो अशा मंदिरात आज फक्त शांतता पाहायला मिळतीये. प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील मंदिराला 5 हजार किलोची सजावट केली जाणार आहे. देहूतील मंदिरही आकर्षक अशा फुलांनी सजवलं जाईल. प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती, देहू संस्थानचे पालखी प्रमुख संजय मोरे यांनी दिलीय.

मानाचे 100 वारकरी मंदिरात सोडणार

संत तुकाराम महाराजांच्या देहूतील पालखीचं प्रस्थान उद्या दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. दुपारी 2 वाजता मानाचे 100 वारकरी मंदिरात सोडले जातील. पूजा होऊन पादूकांना नगर प्रदक्षिणा घातली जाईल आणि पालखी मंदिरातचं विसावेल. 2 जूलैला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होईल आणि माऊलींची पालखी परंपरेप्रमाणे आजोळघरी मुक्कामी विसावेल. 19 जूलैला माऊली आणि तुकाराम शिवशाही बसनं पंढरपूराकडे मार्गस्थ होतील. असा माऊली आणि तुकारामांचा पालखी सोहळा संपन्न होईल.

शासनाच्या निर्णयाचं पालन करणार, वारकऱ्यांकडून आश्वासन

यंदा वारीवरून राज्य सरकारवर बरीच टिका झाली. कारण वारकऱ्यांनी देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर पायी जाण्याची परवानगी मागितली मात्र ती नाकारण्यात आली. कारण वारकरी हा पालखी निघाली की ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता पंढरीजवळ करतो. त्याला आस लागलेली ती विठूरायाच्या भेटीची. मात्र यंदा तसा सोहळा हा महाराष्ट्राला अनुभवता येणार नाहीये, मनात जरी पायी वारी करता येणार नाही ही खंत असली तरी शासनाच्या निर्णयाचं पालन करणार असल्याचं वारकरी सांगतायेत.

समाजावरती संकट आल्यावर वारकरी सांप्रदायानं दिशा दाखवली

शांतता पाहायला मिळत असली, तरी ती इंद्रायणी अजूनही वारकऱ्यांची वाट पाहतीये. इंद्रायणीचा काठ ओस पडला. गेल्या वर्षीची खंत यंदा भरून निघेल. देहू आणि आळंदी वारकऱ्यांनी फुलून जाईल असं वाटलं. मात्र पदरी निराशा पडली. असं जरी असलं, तरी ज्या ज्या वेळी समाजावरती संकट ओढावलं त्या त्या वेळी वारकरी सांप्रदायानं दिशा दाखवली आणि सहिष्णू म्हणजेच संयमाचा मार्ग पत्करला. त्या प्रमाणेच यंदाही वारकऱ्यांची भागवत धर्माची पताका खांद्यावर घेण्याबरोबरचं आरोग्याची पताकाही खांद्यावर घेतली आणि एसटीतूनचं वारी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वारकऱ्यांनी वारकरी धर्माची परंपरा खंडीत न होऊ देता मोठ्या मनाने यंदाचा सोहळा करण्याचं ठरवलंय. त्यामुळे जरी मनात खंत असली तरी मानाचे वारकरी मात्र उत्साहात प्रस्थान सोहळा पार पाडतील.

हेही वाचा :

संत तुकाराम महाराज पालखी 1 जुलैला देहूवरुन पंढरपूरकडे निघणार, वाचा 1 ते 19 जुलैचा प्रस्थान कार्यक्रम

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 2 जुलैला आळंदीतून पंढरपूरकडे निघणार, वाचा 2 ते 24 जुलैचा प्रस्थान कार्यक्रम

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदीत 7 दिवस संचारबंदी, सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार

व्हिडीओ पाहा :

Special report on Sant Dnyaneshwar and Tukaram Palakhi Sohala of Dehu Alandi wari

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.