AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election Results 2022 : भाजपाचा रडीचा डाव, मात्र आम्ही ड्रामा नाही तर सिरिअस काम करतो, सुप्रिया सुळेंचा भाजपावर हल्लाबोल

निवडून आयोगाकडून जे झाले तो बालिशपणा वाटतो. दबाब सगळ्यांवरच आहे. मात्र भाजपातर्फे रडीचा डाव खेळण्यात आला. नबाब मलिक आणि अनिल देशमुख दोषी नसतात त्यांना डांबून ठेवले, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

Rajya Sabha Election Results 2022 : भाजपाचा रडीचा डाव, मात्र आम्ही ड्रामा नाही तर सिरिअस काम करतो, सुप्रिया सुळेंचा भाजपावर हल्लाबोल
भाजपाचे अभिनंदन तसेच टीका करताना सुप्रिया सुळेImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jun 11, 2022 | 1:34 PM
Share

पुणे : भाजपाने हा रडीचा डाव खेळला. शरद पवार (Sharad Pawar) यावर सगळे बोललेच आहेत. आम्ही ड्रामा करत नाहीत तर खूप सिरियस काम करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, की महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रत्येक आमदाराने जबाबदारीने मतदान केले. राज्यसभा निवडणुकीतील या पराभवानंतर आता महाविकास आघाडी एक-दोन दिवसात बैठक घेईल. त्यानंतर स्पष्ट होईल, कुठे काय कमी पडेल. आम्ही रोज रिस्क घेतो. ज्या घरात माझा जन्म झाला तिथे मी जेवढे यश बघितले तेवढेच अपयशही बघितले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘निवडून आयोगाचा बालिशपणा’

निवडून आयोगाकडून जे झाले तो बालिशपणा वाटतो. दबाब सगळ्यांवरच आहे. मात्र भाजपातर्फे रडीचा डाव खेळण्यात आला. नबाब मलिक आणि अनिल देशमुख दोषी नसतात त्यांना डांबून ठेवले, असा आरोप त्यांनी केला. तर शेवटी राज्यसभेत विजयी झालेल्या भाजपाचे अभिनंदनही सुप्रिया सुळे यांनी केले. प्रत्येक निवडणूक जिंकता येत नाही. त्यामुळे आम्ही आमचा पराभव स्वीकार करतो. काय चुकले, काय बरोबर याचा विचार केला जाईल. आम्ही कुठे कमी पडलो, याचे चिंतन करू, असे त्यांनी सांगितले.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

संख्याबळ नसतानाही भाजपाचा विजय

राज्यसभेच्या या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. तर भाजपाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तर संख्याबळ असूनही शिवसेनेच्या संजय पवारांना घरी बसावे लागले. शिवसनेच्या संजय पवारांना राष्ट्रवादीने 9 मते दिली. ती मते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, राजेश टोपे, हसन मुश्रीफ यांनी संजय पवारांना दिली होती. तर निकाल यायला रात्री उशिर झाला. त्यासाठी जी हरकत घेतली तो रडीचा खेळ होता, अशी टीका शरद पवार यांनी केली होती. राज्यसभेच्या निवडणुकीचा नियमानुसार मतदाराने पक्षाच्या नेतृत्वाला मत दाखवण्याचा अधिकार आहे, त्यात बेकायदेशीर काही नाही. तोच निकाल आयोगाने दिला. त्यासाठी चार तास उशीर झाला, असे शरद पवार म्हणाले.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?.