AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक राहणार बंद? काय आहे कारण?

Pune News : पुणे येथील चांदणी चौकाजवळ असणाऱ्या मुंबई-बंगळूर महामार्गाची वाहतूक काही दिवस बंद राहणार आहे. ही वाहतूक बंद असताना पर्याय देण्यात आले आहे. तसेच काही वाहनांना वेगवेगळ्या ठिकाणी थांबवण्यात येणार आहे.

पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक राहणार बंद? काय आहे कारण?
pune bangalore highway
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 29, 2023 | 9:43 AM
Share

पुणे : पुणेकरांसाठी महत्वाचा असणारा चांदणी चौकातील वाहतूक काही दिवस बंद राहणार आहे. काही दिवसासांठी ही वाहतूक बंद असली तरी पुणेकर नागरिकांना चांगली सुविधा त्यानंतर मिळणार आहे. येत्या ४ ते १५ जुलैपर्यंत महामार्गावरील वाहतूक मर्यादीत कालावधीसाठी बंद राहणार आहे. चांदणी चौकात होणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलासाठी गर्डर उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.

काय असणार पर्याय

पुणे येथील मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकात उड्डाण पुल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे गर्डर उभारणीचे काम ४ ते १५ जुलै २०२३ या दरम्यान करण्यात येणार आहे. हे काम रात्री १२.३० ते पहाटे ३.३० दरम्यान करण्यात येणार आहे. यामुळे तीन तास मुख्य रस्त्यावरील वाहतूक महामार्गालगत असणाऱ्या पर्यायी रस्त्यांवर म्हणजे साईड रोडने वळवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.

पुलाचे काम अंतिम टप्प्यात

पुणे येथील चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रकल्पाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. एनडीए- पाषाण मुख्य पुलाचे काम सबस्ट्रक्‍चपर्यंत करण्यात आले आहे. यामुळे मुख्य महामार्गावरील वाहतूक रात्री तीन तास बंद करुन पर्यायी रस्त्यांवरुन होणार आहे. तीन तासांसाठी मल्टी ऍक्‍सेल वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्‍सप्रेस-वे, तळेगाव टोल नाका अन् मुंबई-पुणे जुना महामार्ग, सोमाटणे टोल नाका या ठिकाणीच मल्टी ऍक्सेल वाहने थांबवली जातील. तसेच साताराकडून येणारी वाहने खेड शिवापूर टोल नाका येथे थांबवण्यात येणार आहेत. परंतु हलकी वाहने, बस आणि ट्रक पर्यायी रस्त्याचा वापर करतील.

असा असणार पर्याय

मुंबईकडून साताराकडे जाण्यासाठी सेवा रस्ता रॅम्प-6 चा वापर करता येणार आहे. तसेच मुंबईवरुन कोथरुडकडे जाण्यासाठी हाच मार्ग वापरता येईल. तसेच सातारा अन् कोथरूडमार्गे मुंबईकडे जाण्यासाठी वेदभवन बाजूने सेवा रस्ता व रॅम्प-8 चा वापर वाहनधारकांना करता येणार आहे.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल