AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक राहणार बंद? काय आहे कारण?

Pune News : पुणे येथील चांदणी चौकाजवळ असणाऱ्या मुंबई-बंगळूर महामार्गाची वाहतूक काही दिवस बंद राहणार आहे. ही वाहतूक बंद असताना पर्याय देण्यात आले आहे. तसेच काही वाहनांना वेगवेगळ्या ठिकाणी थांबवण्यात येणार आहे.

पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक राहणार बंद? काय आहे कारण?
pune bangalore highway
| Updated on: Jun 29, 2023 | 9:43 AM
Share

पुणे : पुणेकरांसाठी महत्वाचा असणारा चांदणी चौकातील वाहतूक काही दिवस बंद राहणार आहे. काही दिवसासांठी ही वाहतूक बंद असली तरी पुणेकर नागरिकांना चांगली सुविधा त्यानंतर मिळणार आहे. येत्या ४ ते १५ जुलैपर्यंत महामार्गावरील वाहतूक मर्यादीत कालावधीसाठी बंद राहणार आहे. चांदणी चौकात होणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलासाठी गर्डर उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.

काय असणार पर्याय

पुणे येथील मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकात उड्डाण पुल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे गर्डर उभारणीचे काम ४ ते १५ जुलै २०२३ या दरम्यान करण्यात येणार आहे. हे काम रात्री १२.३० ते पहाटे ३.३० दरम्यान करण्यात येणार आहे. यामुळे तीन तास मुख्य रस्त्यावरील वाहतूक महामार्गालगत असणाऱ्या पर्यायी रस्त्यांवर म्हणजे साईड रोडने वळवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.

पुलाचे काम अंतिम टप्प्यात

पुणे येथील चांदणी चौकात उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रकल्पाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. एनडीए- पाषाण मुख्य पुलाचे काम सबस्ट्रक्‍चपर्यंत करण्यात आले आहे. यामुळे मुख्य महामार्गावरील वाहतूक रात्री तीन तास बंद करुन पर्यायी रस्त्यांवरुन होणार आहे. तीन तासांसाठी मल्टी ऍक्‍सेल वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्‍सप्रेस-वे, तळेगाव टोल नाका अन् मुंबई-पुणे जुना महामार्ग, सोमाटणे टोल नाका या ठिकाणीच मल्टी ऍक्सेल वाहने थांबवली जातील. तसेच साताराकडून येणारी वाहने खेड शिवापूर टोल नाका येथे थांबवण्यात येणार आहेत. परंतु हलकी वाहने, बस आणि ट्रक पर्यायी रस्त्याचा वापर करतील.

असा असणार पर्याय

मुंबईकडून साताराकडे जाण्यासाठी सेवा रस्ता रॅम्प-6 चा वापर करता येणार आहे. तसेच मुंबईवरुन कोथरुडकडे जाण्यासाठी हाच मार्ग वापरता येईल. तसेच सातारा अन् कोथरूडमार्गे मुंबईकडे जाण्यासाठी वेदभवन बाजूने सेवा रस्ता व रॅम्प-8 चा वापर वाहनधारकांना करता येणार आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.