AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईवरुन पुण्यात विमानाऐवजी रस्ता मार्गाने का आले उद्धव ठाकरे? हे कारण आले समोर

बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी येण्याची उद्धव ठाकरे यांनी घाई झाली होती. कारण त्यांना बाबांचे उपोषण लवकर सोडवायचे होते. मुंबईवरुन तीन वाजता उद्धव ठाकरे यांचे विमान होते. त्या विमानाने आले असते तर पुण्यात पोहचण्यास उशीर झाला असता.

मुंबईवरुन पुण्यात विमानाऐवजी रस्ता मार्गाने का आले उद्धव ठाकरे? हे कारण आले समोर
Uddhav Thackeray
| Updated on: Dec 01, 2024 | 12:07 PM
Share

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यात उपोषण सुरु केले आहे. त्यांचा उपोषणाच्या तिसरा दिवस होता. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन केले. शनिवारी अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या भेटी घेतल्या. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची बाबा आढाव यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपोषणस्थळी आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विनंती केल्यावर बाबा आढाव यांनी उपोषण सोडले. परंतु उपोषणस्थळी येण्यासाठी विमानाऐवजी उद्धव ठाकरे थेट रस्ते मार्गाने आले. त्याचा खुलासाही यावेळी करण्यात आला.

बाबा आढाव यांनी २८ नोव्हेंबरपासून उपोषण सुरु केले होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले की, तुम्ही आता आत्मक्लेष करुन घेऊ नका. तुमचे हे आंदोलन पुढे नेण्याचे काम महाविकास आघाडी करणार आहे. ज्यांना ज्यांना वाटते चुकीचे झाले आहे, ते आमच्या बरोबर येतील. त्यानंतर राज्यभर मोठे जनआंदोलन उभारले जाणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच बाबा आढाव यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यानंतर बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ज्यूस घेत उपोषण सोडले.

यामुळे रस्ते मार्गाने पुण्यात

बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी येण्याची उद्धव ठाकरे यांनी घाई झाली होती. कारण त्यांना बाबांचे उपोषण लवकर सोडवायचे होते. मुंबईवरुन तीन वाजता उद्धव ठाकरे यांचे विमान होते. त्या विमानाने आले असते तर पुण्यात पोहचण्यास उशीर झाला असता. यामुळे उद्धव ठाकरे यांनी रस्ते मार्गाने येण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे दुपारी चारपर्यंत ते उपोषण स्थळी पोहचले. त्यानंतर मनोगत व्यक्त करुन बाबा आढाव यांना उपोषण सोडण्यास सांगितले.

महायुतीवर जोरदार टीका

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारची स्थापना होत नसल्याबद्दल महायुतीवर जोरदार टीका केली. तसेच एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. उद्धव ठाकरे म्हणाले, एवढे प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राजभवनात जाण्याऐवजी शेतात का जातात आहेत. अमावस्येचा दिवस का निवडत आहेत. त्यांची मुख्यमंत्री कोण होणा किंवा उपमुख्यमंत्री कोण होता याची काहीच तयारी नाही. बहुमत मिळाल्यावर त्यांच्याकडे आनंदोत्सव नाही. सर्वांचे चेहरे पडले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.