AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जातीत लग्न करा असे ठरवणारे हे कोण?;” खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

लग्नाबद्दल जातीत लग्न करा, असे तुम्ही कोण ठरवणारे ? असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सभेस बसलेल्या मुलींना तुम्हाला चालेल का आम्ही लग्न ठरवलेले असे विचारले.

जातीत लग्न करा असे ठरवणारे हे कोण?; खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल
सुप्रिया सुळे
| Edited By: | Updated on: Feb 25, 2023 | 9:11 AM
Share

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांची इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथे जाहीर सभाझाली. या सभेत त्यांनी राज्य सरकारचा चांगलाच समाचार घेतला. जातीत लग्न करा, असं सांगणारे हे कोण, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री आणि आमदार दत्तात्रय भरणे यांना विचारला. आम्ही आमच्या मुलींचे लग्न कोणत्या जातीत करायचं किंवा कुणाशी करायचं हे सांगण्याचा त्यांना अधिकार नसल्याचंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपवाले सतत उलटे लोकांना सांगत आहेत. लग्नाबद्दल जातीत लग्न करा, असे तुम्ही कोण ठरवणारे ? असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सभेस बसलेल्या मुलींना तुम्हाला चालेल का आम्ही लग्न ठरवलेले असे विचारले.

मुलीच्या लग्नाच्या निर्णयप्रक्रियेत कोण असेल

आपल्या रेवती या मुलीचे लग्न माझे पती सदानंद आणि मी ठरवू. अजित दादा रेवतीचा मामा आहे म्हणून ठरवेल तिचं लग्न कोणाशी करायचं. आमदार दत्तात्रय भरणे मामा व राज्याचे मुख्यमंत्री हे नाही सांगू शकत की रेवतीचं लग्न कुणाशी करायचं. सुप्रिया सुळे आता मुख्यमंत्री आहोत तुमची मुलगी ह्याच्याशी लग्न करेल, असं नाही सांगू शकत. आमच्या मुली आता शिकलेल्या आहेत. त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेतील. माझी मुलगी काय खाईल. कोणाशी लग्न करेल ती कसं जगेल, हे आम्ही कुटुंब ठरवू. किंवा ती निर्णय प्रक्रियेत असेल, असं स्पष्टपणे सुप्रिया सुळे यांनी सुनावलं.

आमचा लढा संविधानासाठी

भारतीय जनता पार्टीला आम्ही तो अधिकार दिलेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील तो कोणालाही अधिकार दिलेला नाही. जे राज्यात चालले आहे ते आपल्या देशाच्या राज्याच्या, समाजाच्या आणि संविधानाच्या विरोधात चालले आहे. माझा लढा हा त्यांच्यासाठी नसून संविधानासाठी आहे, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथे जाहीर सभेत बोलत होत्या. यावेळी त्या आक्रमक दिसल्या. यावेळी त्यांनी भाजपलाही सुनावलं. एकंदरित वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नका. तुम्ही राज्याचे प्रमुख असलात म्हणून काय झालं, असं त्यांना म्हणायचं होते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.