AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अजित पवार यांनी तमाम हिंदू धर्मियांचा अपमान केलाय”: पवारांविरोधात शिर्डीत भाजप रस्त्यावर….

राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलताना सांगितले की, धर्मवीर संभाजीमहाराज यांच्याबद्दल जे विधान केले आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

अजित पवार यांनी तमाम हिंदू धर्मियांचा अपमान केलाय: पवारांविरोधात शिर्डीत भाजप रस्त्यावर....
| Edited By: | Updated on: Jan 02, 2023 | 6:08 PM
Share

शिर्डीः हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक आणि सत्ताधारी असा सामना रंगलेला असतानाच हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वराज्यरक्षक म्हणून वक्तव्य केले होते. त्यावरून विरोधकांसह शिंदे गटानेही अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला होता.

अजित पवार यांनी संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केल्यामुळे त्यांनी हिंदू धर्मियांचा अपमान केला असल्याची टीका करत भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्याविरोधात शिर्डीमध्ये जोरदार मोर्चा काढला.

छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम हिंदू धर्मियांचा अजित पवार यांनी अपमान केल्याची टीका करत महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसह शिर्डीत मोर्चा काढला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने हा मोर्चा काढण्यात आला होता.

अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत साईआश्रम चौकापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होात. या मोर्चामध्ये टाळ, मृदूंग घेत वारकरीदेखील सामील झाले होते. यावेळी अजित पवार यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी विखे-पाटील यांनी केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलताना सांगितले की, धर्मवीर संभाजीमहाराज यांच्याबद्दल जे विधान केले आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू धर्माचे प्रतीक होते. त्यामुळे ते धर्मवीर नव्हते असं वक्तव्यं केलेल्या अजित पवार यांचा आम्ही निषेध करतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.

त्यामुळे संभाजीराजे हे धर्मवीर होते आणि राहणार. ते त्यांच्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही. अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे तमाम हिंदू धर्माचा अपमान अजित पवार यांनी केला आहे असा जोरदार हल्लाबोलही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.