AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जय भवानी, जय शिवाजी बोलायचं आणि मत मिळवायचे दिवस गेले’, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचे झणझणीत अंजन, वक्तव्याने राज्यात एकच खळबळ

Udhav Thackeray Shivsena Raigad Karjat Statement : शिवसेना पक्ष फुटीनंतर राज्यातील राजकारणात मोठे बदल झाले. त्यापूर्वी शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाल्यानंतर राजकारणाचा परीघ बदलला होता. आता उद्धव ठाकरे गट मोठ्या बदलाची नांदी आणत असल्याचे दिसून येत आहे.

'जय भवानी, जय शिवाजी बोलायचं आणि मत मिळवायचे दिवस गेले', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचे झणझणीत अंजन, वक्तव्याने राज्यात एकच खळबळ
शिवसेना बदलत आहे का?
| Updated on: Jan 30, 2025 | 9:23 AM
Share

मुख्यमंत्री पदावरून बिनसल्यानंतर एका पंचवार्षिक पूर्वी शिवसेना आणि भाजपाचे फाटले. शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात यशस्वी केला. त्याला भाजपाने सुरूंग लावला नि राज्यात महायुतीचा अंक सुरू झाला. राज्यातील राजकारणाला या पाच वर्षात अनेक महाभूकंप बसले. शिवसेना, राष्ट्रवादीत उभी फूट पडली. पक्षीय भूमिका बदलत गेली तसा राजकारणाचा परीघ बदलला. आता उद्धव ठाकरे गट मोठ्या बदलाची नांदी तर आणत नाही ना, याची प्रचिती त्यांच्या नेत्याच्या वक्तव्यावरून जाणवत आहे.

आता जुना काळ गेला

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना बदलत्या काळाची जाणीव करून दिली. सध्या कोकण आणि तळकोकणात उद्धव ठाकरे गटातील अस्वस्थता समोर येत आहे. नेते भास्कर जाधव यांनी सुद्धा एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना फटकारले होते. त्यानंतर आता अंबादास दानवे यांनी बदलते राजकारण आणि राजकीय परीभाषा बदलल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिले. आता जुना काळ गेला असे सूचक वक्तव्य त्यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील संवाद मेळाव्यात शिवसैनिकांना दिला.

जय भवानी,जय शिवाजी आणि मते

जुना काळ गेला आता ‘जय भवानी जय शिवाजी बोलायचं आणि मत मिळवायची दिवस गेले.’ असा अजब सल्ला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी कर्जत येथे संवाद मेळाव्यात शिवसैनिकांना दिला. त्यांच्या या वक्तव्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पण सध्या राजकारणात मोठे उलटफेर झाले आहे. मित्रपक्ष आणि विरोधकांशी दोन हात करताना जनतेशी नाळ तुटता कामा नये, विकासाच्या राजकारणावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे भावनिक मुद्दांवर आता मतांचा जोगावा मागता येणार नाही, हे तर दानवे यांना सुचवायचे नसेल ना?

कार्यकर्त्यांशी साधला संवाद

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे ठाकरेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला.विधानसभेच्या निवडणुकीत पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण व्हावे या साठी या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल होत.या संवाद मेळाव्यासाठी विधापरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

यावेळी मार्गदर्शन करताना अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना अनेक कानमंत्र दिले. पण बोलण्याच्या ओघात शिवसेनेची खरी ओळख असणारे घोषवाक्य म्हणजे ‘ जय शिवाजी, जय भावानी ‘ याबाबत अजब वक्तव्य करत राजकारणाची बदललेली परिभाषा व्यक्त केली. आता जय शिवाजी जय भवानी बोलून मते घ्यायचे दिवस गेले असे म्हणत उपस्थितांना कानमंत्र दिला. यावरून ठाकरेंची शिवसेना आता बदलली आहे हे कुठे तरी अधोरेखित होताना दिसत असून शिवसेनेची जुनी ओळख पुसून काही तरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न होतोय का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Follow Us
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.