AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur Rain Live Update: सोलापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, वैराग-जवळगाव रस्ता पाण्यात, कुरनूर धरणातून विसर्ग

वैराग-जवळगाव रस्ता पाण्याखाली गेला असून वैराग जवळगाव रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सोलापुरातील कारंबा येथील ओढा देखील भरून वाहत आहे. (Solapur rain update)

Solapur Rain Live Update: सोलापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, वैराग-जवळगाव रस्ता पाण्यात, कुरनूर धरणातून विसर्ग
| Updated on: Oct 14, 2020 | 12:27 PM
Share

सोलापूर : जिल्ह्यासह सोलापूर शहरामध्ये जोरदार पाऊस सुरूच आहे. वैराग-जवळगाव रस्ता पाण्याखाली गेला असून वैराग जवळगाव रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सोलापुरातील कारंबा येथील ओढा देखील भरून वाहत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसामुळे ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. कुरनूर धरणाच्या 6 दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. अक्कलकोट तालुक्यातील दुधनीतील ओढे वाहत आहेत. कल्याणनगर भागातील 25 ते 30 घरात पाणी शिरले आहे.  (Rain continue in Solapur water come on road water released from Kurnur dam)

[svt-event title=”कल्याणनगर भागातील 25 ते 30 घरामध्ये गुडघाभर पाणी” date=”14/10/2020,12:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अक्कलकोट तालुक्यातील दुधनीतील सर्व ओढे नाले वाहू लागले” date=”14/10/2020,12:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. वैराग शहराला पाणीपुरवठा करणारा हिंगणी प्रकल्प नुकताच ओव्हरफ्लो झाला होता. पावसामुळे वैराग-जवळगाव रस्ता पाण्याखाली गेल्यामुळं या रस्त्यावरिल वाहतूक बंद झाली आहे.

कारंबा येथील ओढा ओव्हर फ्लो झाल्यामुळं नागरिकांनी पाण्यातून वाट काढत जीवघेणा प्रवास सुरू आहे. दूधविक्रेत्यांनी जीव धोक्यात घालून या ओढ्यातून शहराकडे प्रवास केला. सध्या कारंबा येथील ओढ्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू आहे.

अक्कलकोट राजवाड्याचा दुर्बिण बुरुज ढासळला

पावसामुळे अक्कलकोट जूना राजवाड्याचा ऐतिहासिक दुर्बिण बुरुज 373 वर्षांनी ढासळला आहे. छत्रपती शाहू महाराज (संभाजी राजे यांचे पूत्र)यांनी अक्कलकोट संस्थानची निर्मिती केली होती.

कुरनूर धरणाचे सहा दरवाजे उघडले

सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळं अनेक धरण प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. कुरनूर धरण क्षेत्रात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाल्यानं धरणाच्या सहा दरवाजातून 1800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हिंगणी प्रकल्प ओव्हरफ्लो

बार्शी तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प हिंगणी शंभर टक्के भरला आहे. प्रकल्प ओव्ह फ्लो झाल्यानं भोगावती नदीला पूर आला होता. हिंगणी प्रकल्प भरल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. यामुळे वैराग शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. हिंगणी प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने भोगावती नदीला पूर आला होता. भोगावतीला पूर आल्यानं रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले होते. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

शनिवार पासून सुरू असलेल्या पावसाने पंढरपूर मंगळवेढा, माळशिरस, माढा या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरू असताना पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सोयाबीन सह फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोलापूरमध्ये चार दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे.

संबंधित बातम्या :

सोलापुरातील हिंगणी प्रकल्प ओव्हर फ्लो,  भोगावती नदीला पूर

Maharashtra Rain | पंढरपूर तालुक्यातील डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचं नुकसान, शेतकरी संकटात

(Rain continue in Solapur water come on road water released from Kurnur dam)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.