AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तळपायाची आग मस्तकात गेली, …अन् राज ठाकरे प्रचंड संतापले, निवडणूक जाहीर होताच पहिली प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे, यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

तळपायाची आग मस्तकात गेली, ...अन् राज ठाकरे प्रचंड संतापले, निवडणूक जाहीर होताच पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2025 | 6:28 PM
Share

आज अखेर निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदा यांच्या निवडणुकींचा समावेश आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यातील  246  नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहेत, तर तीन डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून सुरू आहे. जोपर्यंत मतदार याद्यांमधील घोळ मिटत नाही, तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नयेत अशी भूमिका विरोधकांची आहे.

आज देखील निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी मनसे आणि महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून निवडणूक आयोगाची भेट घेण्यात आली होती, त्यावेळी देखील विरोधकांनी आपली ही भूमिका कायम ठेवत, जोपर्यंत मतदार याद्यांमधील घोळ संपत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी मागणी केली होती. मात्र त्यानंतर देखील निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी फेसबुकवर आपली पोस्ट शेअर केली आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

‘आजच्या निवडणुक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.  हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे.  दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन’ असं या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मिलिंद नार्वेकर राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'शिवतीर्थ'वर, कारण नेमकं काय?
मिलिंद नार्वेकर राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'शिवतीर्थ'वर, कारण नेमकं काय?.
ठाकरेंना मोठा झटका, काँग्रेस स्वबळावर लढणार; असलम शेख यांचं मोठं विधान
ठाकरेंना मोठा झटका, काँग्रेस स्वबळावर लढणार; असलम शेख यांचं मोठं विधान.
अलख निरंजन...हातात त्रिशूळ घेऊन गावकरी सज्ज, बिबट्याला म्हणावं ये आता
अलख निरंजन...हातात त्रिशूळ घेऊन गावकरी सज्ज, बिबट्याला म्हणावं ये आता.
पराभव स्वीकारा, जो जिता वही सिंकदर...फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार काय?
पराभव स्वीकारा, जो जिता वही सिंकदर...फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार काय?.
नको तिथं चोच मारायची...निवेदिता सराफ यांच्यावर किशोरी पेडणेकर भडकल्या
नको तिथं चोच मारायची...निवेदिता सराफ यांच्यावर किशोरी पेडणेकर भडकल्या.
बिहारमध्ये फडणवीसांची हवा,48 मतदारसंघात धुरळा, NDAला काय बुस्ट मिळाला?
बिहारमध्ये फडणवीसांची हवा,48 मतदारसंघात धुरळा, NDAला काय बुस्ट मिळाला?.
ब्रेक फेल... कंटेनरनं वाहनं उडवली, पुणेकरांचं डेथ स्पॉटवर तिरडी आंदोलन
ब्रेक फेल... कंटेनरनं वाहनं उडवली, पुणेकरांचं डेथ स्पॉटवर तिरडी आंदोलन.
तो आला त्याला माणसं दिसली...4 तास थरार, धिप्पाड बिबट्याचा बघा CCTV
तो आला त्याला माणसं दिसली...4 तास थरार, धिप्पाड बिबट्याचा बघा CCTV.
बिहार निकाल EVMमधून कसा आला? पवारांनी केलं असं विश्लेषण, चर्चांना उधाण
बिहार निकाल EVMमधून कसा आला? पवारांनी केलं असं विश्लेषण, चर्चांना उधाण.
निवेदिता सराफ कट्टर BJP समर्थक...बिहारच्या निकालाचा व्यक्त केला आनंद
निवेदिता सराफ कट्टर BJP समर्थक...बिहारच्या निकालाचा व्यक्त केला आनंद.