Raju Shetti : हे सरकार हार-तुरे अन् उत्सवांमध्येच व्यस्त, विरोधकही काहीच बोलत नाहीत; राजू शेट्टींचा घणाघात

परभणी शहरातील संत तुकाराम महाविद्यालय येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात (Morcha) मोठ्या प्रमाणात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली.

Raju Shetti : हे सरकार हार-तुरे अन् उत्सवांमध्येच व्यस्त, विरोधकही काहीच बोलत नाहीत; राजू शेट्टींचा घणाघात
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 3:16 PM

परभणी : हे सरकार हार-तुरे आणि उत्सवांमध्ये व्यस्थ आहे. त्यांना सामान्य, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नाही. त्यात आता विरोधकही काही बोलत नाहीत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. ते परभणीत बोलत होते. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली आज परभणीत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. शहरातील संत तुकाराम महाविद्यालय येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात (Morcha) मोठ्या प्रमाणात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार जनतेचे नाही. सामान्यांना मदत होत नसेल, तर हे सरकार काय कामाचे, असा सवालही त्यांनी केला आहे.

‘नैसर्गिक आपत्तीमध्येसुद्धा सरकारकडून दुजाभाव’

राज्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र अशा नैसर्गिक आपत्तीमध्येसुद्धा सरकारकडून दुजाभाव केला जात आहे. ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार आहे, त्या ठिकाणी तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली. तर सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या ठिकाणी भरघोस मदत देण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्येसुद्धा सरकार दुजाभाव करत आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

‘मराठवाड्यात प्रचंड नुकसान’

कालपासून मी मराठवाड्यात आहे. कापूस तर पूर्ण नष्ट झालेला आहेच. सोयाबीन आणि मुगाचा पत्ता नाही. 22 ते 28 दिवस पावसाचा मध्ये खंड पडला. त्या काळामध्ये सोयाबीनला पाण्याची गरज होती. मात्र त्याला शेंगही आली नाही. ते केवळ दिसायला हिरवेगार दिसते. अशावेळी प्रशासनाने मदत देणे गरजेचे आहे. 100 कोटींची एफआरपीची थकबाकी आहे. साखर सम्राट मोकाट सुटलेले आहेत. बोगस बियाणे कंपन्यांनी सुळसुळाट घातला आहे. मात्र त्यांच्यावर कृषी विभाग कारवाई करत नाही, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, असले सरकार कार्यकाळ पूर्ण करणार किंवा नाही, त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही.

Non Stop LIVE Update
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.