AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे धांदात खोटं… बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल रामदास कदमांचा पुन्हा मोठा दावा, म्हणाले, दुसऱ्या माळ्यावर…

रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर उद्धव ठाकरे यांनी फार काही बोलणे टाळले. मात्र, अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. शिवाय 1993 मध्ये काय घडले याबद्दल धक्कादायक खुलासा केला. आता परत रामदास कदम यांनी मोठा दावा केला आहे.

हे धांदात खोटं... बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल रामदास कदमांचा पुन्हा मोठा दावा, म्हणाले, दुसऱ्या माळ्यावर...
Ramdas Kadam
| Updated on: Oct 05, 2025 | 2:55 PM
Share

रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल अत्यंत गंभीर आरोप केली. हेच नाही तर या वादात त्यांनी शरद पवार यांना देखील ओढले. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांनंतर अनिल परब यांनी रामदास कदम आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल धक्कादायक खुलासा केला. रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी 1993 मध्ये जाळून घेतले होते की, जाळले होते, याचा तपास करा, असे त्यांनी थेट म्हटले. आता पुन्हा एकदा रामदास कदम यांनी आरोप केले असून सीबीआय चाैकशीची मागणी केली. अनिल परब यांनी दावा केला की, बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ डॉक्टरांची एक मोठी टीम होती. मात्र, रामदास कदम यांनी स्पष्ट म्हटले की, अनिल परब हा धांदात खोटं बोलत आहे. शेवटची दोन दिवस कोणतीही टीम त्यांच्याजवळ नव्हती आणि बाळासाहेबांना कोणालाही भेटू दिले जात नव्हते.

अनिल परबांनी म्हटले होते की, बाळासाहेबांसोबत डॉक्टरांची टीम होती. शेवटच्या दिवशी सर्व नेते आणि डॉक्टर जनतेसमोर गेले. हे धांदात खोटं आहे. अनिल परब खोटं बोलला. मी दाव्याने सांगतो, शेवटचे दोन दिवस बाळासाहेब दुसऱ्या माळ्यावर होते. तिथे कुणाला जाण्याची परवानगी नव्हती. हा म्हणतो असंख्य लोकं भेटत होते. तो खोटं बोलत आहे, असे रामदास कदम यांनी म्हटले.

पुढे रामदास कदम यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत आहेत. प्रेस समोर मी फक्त एकटा गेलो होतो. डॉक्टर कोणी नव्हते. मी फक्त एकटा गेलो. मला सांगितलं बाळासाहेब गेले जाहीर करा. मी गेलो. मी जाहीर केलं. कोणीही डॉक्टर नव्हते. हिंमत असेल तर अनिल परबने नावं सांगितली पाहिजे. चौकशी होईल त्यांची. डॉक्टरांनी प्रेस बुलेटिन का काढलं नाही. याचं उत्तर कोण देईन.

तुझा बाप देईन. अनिल परबने जे सांगितलं ते धांदात खोटं आहे. मी फक्त संशय निर्माण केला. याची चौकशी व्हावी म्हटलं. तिथे कोणी डॉक्टर नव्हते. मी फक्त संशय व्यक्त केला. संशय व्यक्त करून चौकशीची मागणी केली तर चूक काय. तू का बोलतो. उद्धव ठाकरे का बोलत नाहीत. बापाच्या बाबतीत कुणी संशय निर्माण केला तर मुलाने बोललं पाहिजे. या दलालाला सांगितलं बोलायला, असेही रामदास कदम यांनी म्हटले.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक