AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास कदम अडचणीत? बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूच्या दाव्यानंतर थेट अब्रुनुकसानीचा दावा, अनिल परबांचे गंभीर आरोप

माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या दाव्याने राजकारणात एक खळबळ उडाली. रामदास कदम यांनी दिवंगत नेते तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी दावे केले आहेत. आता अनिल परब यांनी अत्यंत मोठा दावा केला आहे.

रामदास कदम अडचणीत? बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूच्या दाव्यानंतर थेट अब्रुनुकसानीचा दावा, अनिल परबांचे गंभीर आरोप
Anil Parab and Ramdas Kadam
| Updated on: Oct 04, 2025 | 12:24 PM
Share

नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा झाला. यावेळी माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या दाव्याने राजकारणात एक खळबळ उडाली. रामदास कदम यांनी दिवंगत नेते तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी दावे केले आहेत. बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवला? याचा तपास करावा असे त्यांनी म्हटले. रामदास कदम यांनी केलेल्या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली. मी हे फार मोठं विधान करतो आहे, असेही त्यांनी म्हटले. त्यानंतर राजकारणात मोठा भूकंप आला. आता अनिल परब यांनी अत्यंत मोठा दावा केला आहे.

अनिल परबांनी थेट म्हटले की, मी रामदास कदम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करत आहे. रामदार कदम यांची नार्काे टेस्ट झालीच पाहिजे. योगेश कदम यांनी बापाचे उद्योग तपासली पाहिजेत. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्युपत्राचा मी स्वत: साक्षीदार आहे. रामदास कदम हे भाडगिरी करणारे लोक आहेत. 1993 मध्ये कदमांच्या पत्नीने स्वत:ला जाळून घेतले की, जाळले हे तपासले पाहिजे, असा थेट गंभीर आरोप अनिल परब यांनी म्हटले.

पुढे परबांनी म्हटले की, 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी स्वत:ला जाळून का घेण्याचा प्रयत्न केला की, त्यांना जाळले हे तपासले पाहिजे. आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याच्या घरात बघायचे वाकून हे सुरू आहे. दारू पिऊन तिकडे खेडमध्ये काय धुमाकूळ घालता हे आम्ही अधिवेशनात मांडू असे म्हणत त्यांनी मोठा इशारा दिला. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युबद्दल शंका उपस्थित करता. मी यांना कोर्टात खेचणार आहे. यांना माफी मागावीच लागणार आहे.

माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की, नार्काे टेस्ट झालीच पाहिजे पण 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी स्वत:ला जाळून का घेतले याचीही नार्काे टेस्ट करा. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आम्ही लगेचच बाळासाहेबांचा मृत्यु जाहीर केला. त्यामुळे हा जो आरोप केला आहे, त्या आरोपाचे सत्य बाहेरच आले पाहिजे. मेलेल्या माणसाचे ठसे घेतल्यावर त्याचा काहीही उपयोग होत नाही. कदमांनी माफी मागावी, नाही तर कायदेशीर कारवाई करणारच असे अनिल परबांनी स्पष्ट म्हटले आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक