AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास कदम जे बोलत आहेत ते बरोबर, मंत्री नितेश राणे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल मोठा दावा

नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी अत्यंत मोठा दावा केला, ज्याने एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. आता त्यावरच मोठे विधान मंंत्री नितेश राणे यांनी केले.

रामदास कदम जे बोलत आहेत ते बरोबर, मंत्री नितेश राणे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल मोठा दावा
Nitesh Rane
| Updated on: Oct 03, 2025 | 1:02 PM
Share

मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला. मात्र, यावेळी माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या दाव्याने राजकारणात एकच खळबळ उडाली. रामदास कदम यांनी दिवंगत नेते तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी दावे केले आहेत. बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवला? याचा तपास करावा असे थेट म्हटले. हे विधान जबाबदारीने करत आहे, मी हे फार मोठं विधान करतो आहे, असेही त्यांनी म्हणत याची चाैकशी एकनाथ शिंदे यांना करा म्हटले. रामदास कदम यांचे बोलणे अनेकांना मोठा धक्का बसला.

रामदास कदम यांनी केलेल्या या विधानावर आता मंत्री नितेश राणे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे म्हणाले की, रामदास कदम यांचा बाण बरोबर सुटलाय. याचे उत्तर दिले पाहिजे की, स्वित्झर्लंडच्या विमानातून कोण येणार होते, कोण वाट पाहत होते, कोणत्या कागदपत्रासाठी वाट पाहिली गेली, कोणत्या संपत्तीसाठी? याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले पाहिजे. रामदास कदम जे बोलत आहेत ते बरोबर आहे.

पुढे नितेश राणे म्हणाले की, उद्वव ठाकरे, आदित्य ठाकरे मातोश्रीकडून उत्तर मागितले पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पहिला मोर्चा उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर काढावा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बांधावर काही दिलं ना चांदावर काही दिले नाही. झालेल्या प्रत्येक नुकसानीची भरपाई आम्ही सरकार म्हणून नक्कीच करू असेही मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नितेश राणे यांनी म्हटले.

रामदास कदम यांनी केलेल्या खळबळजनक विधानानंतर आता नितेश राणे यांनीही मोठा दावा केला असून स्वित्झर्लंडच्या विमानाची वाट पाहिली जात असल्याचे त्यांनी म्हटले. यासोबतच रामदास कदम बरोबर बोलत असल्याचेही त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वीच दिशा सालियान प्रकरणात नितेश राणे यांनी अत्यंत गंभीर आरोप ही आदित्य ठाकरे यांच्यावर केली होती.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.