AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खेड तालुक्यातील विष्णू भगत, लिंबं…, कदमांचा भास्कर जाधवांबद्दल पुन्हा मोठा गौप्यस्फोट

रामदास कदम यांनी पुन्हा एकदा भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

खेड तालुक्यातील विष्णू भगत, लिंबं..., कदमांचा भास्कर जाधवांबद्दल पुन्हा मोठा गौप्यस्फोट
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 26, 2025 | 3:08 PM
Share

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 1995 साली मी शिवसेना प्रमुखांशी बोलून भास्कर जाधव यांना विधानसभेचं तिकीट देण्यास सांगितलं होतं, मात्र जाधव ऐसान फरामोश माणूस आहेत. शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून ते शरद पवारांकडे गेले, असं कदम यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले कदम? 

कदम यांनी पुन्हा एकदा भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  1995 साली मी शिवसेना प्रमुखांशी बोलून भास्कर जाधव यांना विधानसभेचं तिकीट देण्यास सांगितलं होतं, मात्र जाधव ऐसान फरामोश माणूस आहेत. शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून ते शरद पवारांकडे गेले. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उठाव केला तेव्हा ते धावत आले होते. आम्ही सोंगाड्या नाव दिलं आहे. खेड तालुक्यातील विष्णू भगत यांच्या घरी लिंबू घेऊन तुमच्या घरातील महिला गेली होती की नाही ते सांगा? आज तुम्ही फक्त 1100 मतानं निवडून आला आहात, तुम्ही पडणार आहात. 2009 ला तुम्ही नाही तर मला उद्धव ठाकरे यांनी पाडलं असा हल्लाबोल कदम यांनी केला आहे.

दरम्यान मराठी भाषेच्या मुद्द्यावरून त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.  उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की,  ही आंदोलनाची सुरूवात असेल. सक्ती असेल तर तोपर्यंत आंदोलन सुरू राहील,  भाषिक आणीबाणी आहे. सक्ती स्विकारणार नाही.  मला वाटत राज ठाकरे यांची भूमिका पहिल्यापासून आहे, पण आता सर्व बाकीचे उतरत आहेत. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे सर्व सुरू आहे, असं यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.

भास्कर जाधव यांनी काय केला होता आरोप 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी कदम यांच्यावर गंभीर आरोप केला होता, 2009 ची निवडणूक जिंकण्यासाठी कदम यांनी अघोरी पूजा केली होती, असा गौप्यस्फोट जाधव यांनी केला होता, त्यानंतर आता कदम यांच्याकडून देखील या आरोपांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.