AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खेड तालुक्यातील विष्णू भगत, लिंबं…, कदमांचा भास्कर जाधवांबद्दल पुन्हा मोठा गौप्यस्फोट

रामदास कदम यांनी पुन्हा एकदा भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

खेड तालुक्यातील विष्णू भगत, लिंबं..., कदमांचा भास्कर जाधवांबद्दल पुन्हा मोठा गौप्यस्फोट
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 26, 2025 | 3:08 PM
Share

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 1995 साली मी शिवसेना प्रमुखांशी बोलून भास्कर जाधव यांना विधानसभेचं तिकीट देण्यास सांगितलं होतं, मात्र जाधव ऐसान फरामोश माणूस आहेत. शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून ते शरद पवारांकडे गेले, असं कदम यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले कदम? 

कदम यांनी पुन्हा एकदा भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  1995 साली मी शिवसेना प्रमुखांशी बोलून भास्कर जाधव यांना विधानसभेचं तिकीट देण्यास सांगितलं होतं, मात्र जाधव ऐसान फरामोश माणूस आहेत. शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून ते शरद पवारांकडे गेले. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उठाव केला तेव्हा ते धावत आले होते. आम्ही सोंगाड्या नाव दिलं आहे. खेड तालुक्यातील विष्णू भगत यांच्या घरी लिंबू घेऊन तुमच्या घरातील महिला गेली होती की नाही ते सांगा? आज तुम्ही फक्त 1100 मतानं निवडून आला आहात, तुम्ही पडणार आहात. 2009 ला तुम्ही नाही तर मला उद्धव ठाकरे यांनी पाडलं असा हल्लाबोल कदम यांनी केला आहे.

दरम्यान मराठी भाषेच्या मुद्द्यावरून त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.  उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की,  ही आंदोलनाची सुरूवात असेल. सक्ती असेल तर तोपर्यंत आंदोलन सुरू राहील,  भाषिक आणीबाणी आहे. सक्ती स्विकारणार नाही.  मला वाटत राज ठाकरे यांची भूमिका पहिल्यापासून आहे, पण आता सर्व बाकीचे उतरत आहेत. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे सर्व सुरू आहे, असं यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.

भास्कर जाधव यांनी काय केला होता आरोप 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी कदम यांच्यावर गंभीर आरोप केला होता, 2009 ची निवडणूक जिंकण्यासाठी कदम यांनी अघोरी पूजा केली होती, असा गौप्यस्फोट जाधव यांनी केला होता, त्यानंतर आता कदम यांच्याकडून देखील या आरोपांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.

Follow Us
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची...
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची....
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज.
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ.
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार.....
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार......
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात...
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात....
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला.
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्.
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल...
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल....