AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तेव्हाच मोठी चूक झाली; ठाकरे बंधूंच्या युतीवर रामदास कदम यांचं मोठं वक्तव्य

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र येणार अशी आता चर्चा सुरू झाली आहे, यावर प्रतिक्रिया देताना कदम यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

...तेव्हाच मोठी चूक झाली; ठाकरे बंधूंच्या युतीवर रामदास कदम यांचं मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 20, 2025 | 5:44 PM
Share

महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युतीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रापुढे आमचे वाद, भांडणं या किरकोळ गोष्टी आहेत, त्यामुळे एकत्र येण्यास मला तरी काही अडचण वाटत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले कदम? 

मी आणि बाळा नांदगावकर आम्ही दोघांनी ठाकरे बंधुंना एकत्र यावेत यासाठी खूप प्रयत्न केले. राज ठाकरे यांनी अनेकवेळा उद्धव ठाकरेंच्या समोर हात पुढे केला. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे कधीच हा म्हटले नाहीत. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. राज ठाकरे यांची त्यावेळची मागणी होती, आम्हाला फक्त दोन जिल्हे द्या, एक पुणे आणि दुसरा नाशिक असं कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे स्पष्ट बोलणारे आहेत, उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना कधीच पुढे येऊ देणार नाहीत, त्यावेळीला महाबळेश्वरमध्ये आमच्याकडून मोठी चूक झाली, आम्ही उद्धव ठाकरेंना पक्षाचं अध्यक्ष केलं. त्याचवेळी राज ठाकरे यांना अध्यक्ष करायला पाहिजे होतं. राज ठाकरे जर अध्यक्ष झाले असते तर, शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते, शिवसेना फुटली नसती. राज ठाकरे वाघासारखा माणूस आहे, असं कदम यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहिले तर राज ठाकरे त्यांच्यासोबत युती करतील असं मला वाटत नाही. कारण राज ठाकरे स्वाभिमानी माणूस आहे. मात्र दोन्ही भाऊ एकत्र आले, कुटुंब म्हणून एकत्र आले तर आनंद होईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....