AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारमुळे मजुरांची उपेक्षा, भाजप नेत्यांनी खोटं बोलणं सोडावं : सचिन सावंत

भाजप नेत्यांनी रेल्वेच्या भाड्याबाबत मांडलेली भूमिका खोटी होती. आता भाजप नेत्यांनी खोटं बोलण सोडावं, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे (Sachin Sawant on Modi government and corona crisis).

मोदी सरकारमुळे मजुरांची उपेक्षा, भाजप नेत्यांनी खोटं बोलणं सोडावं : सचिन सावंत
| Updated on: May 30, 2020 | 4:42 PM
Share

मुंबई : भाजप नेत्यांनी रेल्वेच्या भाड्याबाबत मांडलेली भूमिका खोटी होती. केंद्र सरकारनं कोर्टात भाडं राज्यानं दिल्याचं स्पष्ट केलं आहे. आता भाजप नेत्यांनी खोटं बोलण सोडावं, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे (Sachin Sawant on Modi government and corona crisis). यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारमुळेच मजुरांची उपेक्षा झाल्याचाही आरोप केला.

सचिन सावंत म्हणाले, “भाजप नेत्यांनी रेल्वेच्या भाड्याबाबत मांडलेली भूमिका खोटी होती. केंद्र सरकारनं कोर्टात भाडं राज्यानं दिल्याचं स्पष्ट केलं आहे. आता भाजप नेते ते अनुदान असल्याचं म्हणत आहेत. मात्र, यावरुन रेल्वेचं राजकारण केलं जात असल्याचं स्पष्ट होत आहे. केंद्राच्या अपयशामुळंच मजुरांची उपेक्षा झाली. याबाबत भाजप नेत्यांनी आता खोटं बोलणं सोडावं.”

मोदी सरकारला सहा वर्षे झाले. आज देश कोरोनाच्या संकटात लोटला गेला त्याला फक्त मोदी सरकार कारणीभूत आहे. हेच मोदी सरकारचं मोठं अपयश आहे. मोदी त्यांच्या कामाचं कौतुक करण्यात गुंग आहेत. पण देश संकटाच्या दरीत लोटला गेलाय. जीडीपी फक्त आताच कमी होईल असं नाही. याआधीही जीडीपीचे दर कायम खाली जात होते. कोरोनाचं संकट आता आलं, पण मोदी सरकारच्या काळात आधीपासून जीडीपीचा हा दर कमी होत गेला. जीडीपीनं गेल्या दशकातील निचांक गाठला होता. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची धोरणं जबाबदार आहेत, असंही सचिन सावंत म्हणाले.

लॉकडाऊन हा कोरोना नियंत्रणावरील अंतिम उपाय नाही. लॉकडाऊनचा उपयोग हा कोरोना चाचण्या वाढवण्यासाठी आणि आरोग्यविषयक सोयी सुविधा वाढवण्यासाठी करायला हवा होता. पण केंद्र सरकारने तसं केलं नाही. त्यामुळं अर्थचक्रही रुतून बसलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

मुंबईत 24 तासात 192 कोरोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती, सुदैवाने 196 बाळ निगेटिव्ह

वरळी पॅटर्न वगैरे काही नाही, सरकारने बनवाबनवी थांबवावी : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांची कुलगुरुंसोबत बैठक, अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या निर्णयाकडे लक्ष

व्हिडीओ पाहा :

Sachin Sawant on Modi government and corona crisis

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.