AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्याचा बालेकिल्ला कुणाचा? इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे, संदिपान भुमरे यांच्यात काँटे की टक्कर

Lok Sabha Election Results 2024 : छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 2004, 2009 आणि 2014 मध्ये तीन वेळी चंद्रकांत खैरे खासदार झाले. परंतु 2019 मध्ये एमआयएमने वंचित बहुजन आघाडीच्या मदतीने चमत्कार घडवला होता. यंदा समीकरणे बदलली आहेत. कोण राखणार हा गड?

मराठवाड्याचा बालेकिल्ला कुणाचा? इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे, संदिपान भुमरे यांच्यात काँटे की टक्कर
गड कुणाचा?
| Updated on: Jun 04, 2024 | 10:16 AM
Share

मराठवाडा हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण शिवसेनेची दोन शक्कलं झाल्यानंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होत आहे. छत्रपती संभाजीनगगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संदिपान भुमरे एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी पण जोरदार मोर्चेबांधणी केली होती. आता अवघ्या काही तासात बालेकिल्ला कोणता गट राखणार हे स्पष्ट होईल.

यावेळी झाले 63.07 टक्के मतदान

मराठवाड्यातील सर्वाधिक चुरस अर्थातच छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसेल. औरंगाबाद मतदारसंघासाठी शिवसेनेतील दोन्ही गट, एमआयएम यांच्यात मोठी चुरस दिसत आहे. पहिल्या फेरीतील मतांच्या आकडेवारीतील चढउताराने समर्थक, नेते मंडळीत मोठी घालमेल होत आहे. या लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान झाले. या मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर मध्य, छत्रपती संभाजीनगर पूर्व, छत्रपती संभाजीनगर पश्चिम, कन्नड, वैजापूर आणि गंगापूर या 6 मतदार संघाांचा समावेश आहे.

27 फेऱ्यात मतमोजणी

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एमआयटी महाविद्यालयात सकाळी 8 वाजेपासून सुरु झाली आहे. मतमोजणीच्या एकूण 27 फेऱ्या होणार आहेत. दुपारी 3 वाजल्यानंतर विजयाचे चित्र सुस्पष्ट होईल. पण त्यापूर्वीच्या मत मोजणीच्या फेऱ्यांनी अनेकांची उत्सुकता ताणली आहे. तर काहींची चिंता वाढवली आहे. पहिल्या फेरीतच अनेकांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले आहेत. औरंगाबादचा खासदार कोण होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचेच नाही तर राज्याचे लक्ष लागले आहे.

दुसऱ्या फेरीत इम्तियाज जलील यांची आघाडी

पहिल्या फेरीतील आकडेवारी समोर आलेली आहे. यामध्ये एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. 13748 मतांनी इम्तियाज जलील आघाडीवर आहेत. इम्तियाज जलील यांना 30200 मते मिळाली. तर दुसऱ्या फेरीत इम्तियाज जलील यांना 30560, संदीपान भुमरे यांना 20066 तर चंद्रकांत खैरे यांना 13883 मते मिळाली. इम्तियाज जलील 10494 मतांनी पुढे होते. येत्या फेऱ्यांमध्ये अजून चित्र स्पष्ट होईल. मराठवाड्याच्या राजधानीत एमआयएम सातत्य राखते की शिवसेना पुन्हा हा गड राखेल हे अवघ्या काही तासात स्पष्ट होईल.

Follow Us
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळेंची खासदारांसह पंतप्रधानांच्या भेट
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर
बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही...
Chandrashekhar Bawankule | कुणबी प्रमाणपत्रावरून मोठा ट्विस्ट! बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही; अधिकाऱ्याचं पत्र आलं समोर
अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
Manoj Jarange VS Chandrashekhar Bawankule | अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; बावनकुळेंवरही जोरदार हल्लाबोल
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं थेट विधान
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले...
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्तींची अचानक बदली, नेमकं काय घडलं?
आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा! आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक
MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, शुद्ध....
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या...
नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा
Ganesh Naik | नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा; नेमका निशाणा कुणावर?
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय