AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalna Accident : समृद्धी महामार्गावर मृत्यूचं तांडव, 6 मजूर महिलांना ट्रकने चिरडलं

जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच ते सहा मजूर महिलांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. काम करत असताना ट्रकने त्यांना चिरडले आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Jalna Accident : समृद्धी महामार्गावर मृत्यूचं तांडव, 6 मजूर महिलांना ट्रकने चिरडलं
jalna accidentImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 01, 2026 | 6:50 PM
Share

Jalna Samruddhi Highway Accident : वाहतुकीच्या नियमांचे पालन करूनच नेहमी प्रवास करावा, वाहन चालवावे असा सल्ला दिला जातो. महामार्गांवर प्रवास करताना नियमांचे उल्लंघन केल्यास अपघात होण्याची दाट शक्यता असते. आतापर्यंत अशा प्रकारचे अनेक भीषण अपघात समोर आलेले आहेत. आता पुन्हा एकदा जालना जिल्ह्यात एक मोठा आणि दुर्दैवी अपघात झाला आहे. या अपघातात 5 ते 6 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचे हेलावून टाकणारे काही फोटो समोर आले असून मृतांबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमका अपघात कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसा जालन्यात समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 ते 6 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. जालन्यातील कडवंची शिवारात ही घटना घडली आहे. नागपूरवरून मुंबईच्या दिशेने एक ट्रक निगाले होते. हा ट्रक भरधाव वेगात समृद्धी महामार्गावरून जात होता. याच भागात मजूर महिला काम करत होत्या. कामात गुंतलेल्या असतानाच भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने या मजूर महिलांना थेट उडवलं आहे. या अपघातात पाच ते सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृत महिलांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची मागणी

या भीषण अपघाताबाबत समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पालिसांकडून या घटनेची चौकशी केली जात आहे. मृत मजूर महिलांची ओळख पटवली जात आहे. अपघातानंतर काही काळासाठी समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत परिस्थिती पूर्वपदावर आणला. या घटनेची आता सखोल चौकशी केली जाणार आहे. दुसरीकडे मृत्युमुखी पडलेल्या मजूर महिलांच्या कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे सरकार काही मदत करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावर याआधीही अनेक मोठे अपघात झालेले आहेत. समृद्धी महामार्गावर कुठेही गतीरोधक नाही. तसेच हा सरळमार्गी रस्ता असल्याने वाहनांची गती खूप असते. त्यामुळेच एखादी जरी चूक झाली तरी मोठा आणि भीषण अपघात होतो.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.