AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-पाकिस्तान सामन्यानंतर संजय राऊतांचे गंभीर आरोप, थेट म्हणाले, सामना फिक्सिंग..

काल झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यावरून संजय राऊत यांनी अत्यंत मोठा आणि गंभीर आरोप केलाय. संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आरोप केली आहेत. हेच नाही तर त्यांनी या सामनया फिक्सिंग असल्याचे म्हटले आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यानंतर संजय राऊतांचे गंभीर आरोप, थेट म्हणाले, सामना फिक्सिंग..
Sanjay Raut
| Updated on: Sep 15, 2025 | 10:25 AM
Share

काल भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारून पराभव केला. मात्र, भारतीय क्रिकेट संघाने हा सामना खेळू नये, अशी मागणी केली जात होती. हेच नाही तर हा सामना रद्द करण्यात यावा असे सांगितले जात होते. भारतीय क्रिकेट संघाची देखील हा सामना न खेळण्याची भूमिका नव्हती, मात्र त्यांच्यावर सरकारचा दबाव होता, असा आरोप राऊतांनी केला. संजय राऊत यांनी या सामन्यावरून सरकारला खडेबोल सुनावले आहेत.  यासोबतच त्यांनी काही गंभीर आरोप केली आहेत. संजय राऊत म्हणाले की, 25 हजार कोटी काल पाकिस्तानमध्ये या सामन्यानंतर गेली आहेत. पाकिस्तान हा पैसा भारताच्याविरोधात वापरणार. पैशांसाठी तुम्ही एका सामन्यावर बंदी घालू शकत नाहीत?

पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, भारत पाकिस्तान सामना हा फिक्सिंग होता. ज्या पाकिस्तानला कर्ज मिळू नये, याकरिता आपण प्रयत्न केली, त्याला सामन्यातून पैसा कमावून दिले. संधी असताना भाजपाने माघार घेतली. कालच्या सामन्यात दीड लाख कोटींचा जुगार खेळला गेला. भारताने सामना खेळून नाचक्की करून घेतलीये. संघाची इच्छा नसताना हा सामना खेळवला गेल्याचे सुनील गावस्कर यांनी काल म्हटले.

यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत संजय राऊत यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांनी सर्वात अगोदर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावणे बंद करावे. शेक हॅंड केले नसल्याचे सांगितले जात आहे…पण तुम्ही सामना तर खेळला ना? भारत पाकिस्तान सामन्यावर संजय राऊत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की, हा सामना संघातील खेळाडूंना खेळायचा नव्हता. मात्र, सरकारच्या दबावामुळे खेळावा लागला.

काल राज्यभरात भारत आणि पाकिस्तान सामन्याला विरोध करण्यात आला. उबाठा गटाने आंदोलने देखील केली. पहलगाम हल्ल्याला काही महिने पूर्ण झाली नाहीत, तोवरच अशाप्रकारचा क्रिकेट सामना खेळणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले. पहलगाम हल्लयात अनेक भारतीय लोकांचे जीव गेले अजूनही भारताकडून ऑपरेशन सिंदूर हे राबवले जात आहे.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.