भाजपचा शिमगा रोज सुरू आहे, आम्ही शिमगा सुरू केला तर…; sanjay raut यांचा भाजपला इशारा

भाजपच्या (bjp) रंगात भेसळ आहे. ते भेसळीचे रंग वापरतात. त्यांच्या भेसळीच्या रंगांना आम्ही घाबरत नाही. त्यांचा रंग रेड असेल किंवा इतर काही असेल, होळी ही वर्षातून एकदा येते. पण यांचा शिमगा रोज सुरू आहे.

भाजपचा शिमगा रोज सुरू आहे, आम्ही शिमगा सुरू केला तर...; sanjay raut यांचा भाजपला इशारा
भाजपचा शिमगा रोज सुरू आहे, आम्ही शिमगा सुरू केला तर...; sanjay raut यांचा भाजपला इशाराImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 10:43 AM

मुंबई: भाजपच्या (bjp) रंगात भेसळ आहे. ते भेसळीचे रंग वापरतात. त्यांच्या भेसळीच्या रंगांना आम्ही घाबरत नाही. त्यांचा रंग रेड असेल किंवा इतर काही असेल, होळी ही वर्षातून एकदा येते. पण यांचा शिमगा रोज सुरू आहे. आम्ही रोज शिमगा करायला सुरुवात केली तर महाराष्ट्रातही खूप खड्डे खोदलेले आहेत. त्यात कोण पडेल हे हळूहळू दिसेल, असा इशारा संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपला दिला आहे. शिवसेना (shivsena) हा मोठा पक्ष आहे. शिवसेनेचं आव्हान मोठं आहे. ज्यांचं आव्हान मोठं असतं त्याच्याविरोधात बोंब मारली जाते. ज्यांचं आव्हान नाही, ज्यांच्या दंडात ताकद नाही, त्यांच्याकडून ही बोंब मारली जाते. भाजपच्या दंडात ताकत आहे असं त्यांना वाटतं. पण ते समोरून वार करत नाहीत. पाठिमागून करतात. अडीच वर्ष झाले ठाकरे सरकारला. अजून अडीच वर्ष जातील. आम्ही पुन्हा पाच वर्ष सत्तेत राहू, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. भाजपने शिमग्याचा अर्थ समजून घ्यावं. भाजपने. त्या पद्धतीने रंग उधळावे. महाराष्ट्राचा रंग स्वाभिमान, अखंडता आणि एकोप्याचा आहे. हे तुम्ही समजून घ्यावं. सध्या कशावरून काय होईल. त्याबद्दल न बोललेलं बरं. इतकं राजकारण बिघडवून ठेवलं आहे. महाराष्ट्रातील सुसंस्कृतपणा महाराष्ट्रातील राजकारणातील विनोद आणि संवेदनशील मन त्यांनी बिघडवून ठेवलं हे वातावरण कधीच नव्हतं. ते दुर्देवाने भाजपने केलं आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

भाजप नकली रंग उधळतोय

भाजपला वाटत असेल केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जाईल. खोटे आरोप, चिखलफेक करून महाविकास आघाडीचे खासदार, आमदार आणि नेत्यांचं मनोबल खाली आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. आम्ही मजबूत आहोत. काल शरद पवार यांनी विश्वास दिलेला आहे. घाबरू नका. मी पुन्हा महाराष्ट्रात भाजपला येऊ देणार नाही. ही पवारांची भूमिका फक्त राष्ट्रवादीची नाही, ती महाविकास आघाडीच्या वतीने त्यांनी भूमिका मांडली आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी तरुण आमदारांसमोर भूमिका मांडली आहे. भाजपमधील आमचे मित्रं रोज तारखा देत आहेत. रोज रंग उधळत आहेत. ते नकली रंग आहेत. अशा नकली रंगांवर केंद्रीची बंदी आहे. काल त्यांना पवारांनी उत्तर दिलं आहे. काही झालं तरी महाराष्ट्रात भाजप येणार नाही, असं राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या:

मुंबईतील चहाप्रेमींचे तोंड पोळणार; चहा आणि कॉफी इतक्या रुपयांनी महागणार, टी अँड कॉफी असोसिएशनचा निर्णय

Akola | वारंवार लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या कबड्डी प्रशिक्षकाला जन्मठेप

Maharashtra News Live Update : आम्ही शिमगा केला तर महाराष्ट्रात खड्डे खूप आहेत – संजय राऊत

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.