AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली, सरकार जनतेलाच घाबरू लागलंय, संजय राऊत का संतापले?

आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटका केल्या. महाराष्ट्र जणू मोगलाई अवतरली .. सरकार जनतेलाच घाबरु लागले, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली, सरकार जनतेलाच घाबरू लागलंय, संजय राऊत का संतापले?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 20, 2023 | 9:36 AM
Share

मुंबई : महाराष्ट्र सरकार (Maharashtra Govt) आता जनतेलाच घाबरू लागले आहे. राज्यात जणू मोगलाई अवतरल्यासारखी वाटतेय, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे. विदर्भातील पाणीप्रश्न घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापर्यंत पदयात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुख यांना मिळालेल्या वागणुकीमुळे संजय राऊत यांचा संताप झालाय. अकोला ते नागपूर असे दहा दिवस पदयात्रा करत नागपूरपर्यंत आलेले आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी फडणवीसांच्या घरी भेट देण्याची परवानगी नाकारली होती. आज नागपूरच्या हद्दीबाहेरच पोलिसांनी त्यांना रोखले. कारवाईसाठी पोलीस आले असताना नितीन देशमुख हे जमिनीवर झोपले. अशा अवस्थेत पोलिसांनी त्यांचे हात पाय धरले आणि त्यांना उचलून नेलं.

नागपूरच्या वेशीवर काय घडलं?

10 एप्रिल पासून अकोल्याहून निघालेले आमदार नितीन देशमुख आज नागपूरच्या वेशीवर पोहोचले. पोलिसांनी नागपूरच्या हद्दीवरच ही संघर्षयात्रा थांबवली. आमदार देशमुख आणि इतर आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केलं. सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नागपूरच्या वेशीवर वडधान्ना येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दत्तवाडी परिसरातही पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात होती. पोलिसांनी संघर्षयात्रेला पुढे जाण्यास मज्जाव केला. फडणवीस यांच्या घरापर्यंत जाण्याची परवानगी आंदोलकांनी माहिती होती. मात्र ही मागणी फेटाळून लावली. आमदार नितीन देशमुख यांच्यासह आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केलं. अखेर पोलिसांनी नितीन देशमुख यांचे दोन हात आणि दोन पाय पकडून अक्षरशः उचलून नेलं.

संजय राऊत यांचं ट्विट..

आमदार नितीन देशमुख यांना दिलेल्या वागणुकीनंतर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिलंय.. पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुखना अटक झाली.नागपूरचा हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले. खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले.आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटका केल्या. महाराष्ट्र जणू मोगलाई अवतरली .. सरकार जनतेलाच घाबरु लागले!

नितीन देशमुख यांचा इशारा..

अकोला आणि अमरावती येथील जनतेला खारं पाणी प्यावं लागतं. ही समस्या घेऊन आम्ही फडणवीसांकडे निघालो होतो. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवणार, असा इशारा नितीन देशमुख यांनी दिलाय. तर पाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी जाऊन आंदोलनदेखील करू, असा इशारा आंदोलकांनी दिलाय.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.