AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली, सरकार जनतेलाच घाबरू लागलंय, संजय राऊत का संतापले?

आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटका केल्या. महाराष्ट्र जणू मोगलाई अवतरली .. सरकार जनतेलाच घाबरु लागले, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली, सरकार जनतेलाच घाबरू लागलंय, संजय राऊत का संतापले?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 20, 2023 | 9:36 AM
Share

मुंबई : महाराष्ट्र सरकार (Maharashtra Govt) आता जनतेलाच घाबरू लागले आहे. राज्यात जणू मोगलाई अवतरल्यासारखी वाटतेय, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे. विदर्भातील पाणीप्रश्न घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापर्यंत पदयात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुख यांना मिळालेल्या वागणुकीमुळे संजय राऊत यांचा संताप झालाय. अकोला ते नागपूर असे दहा दिवस पदयात्रा करत नागपूरपर्यंत आलेले आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी फडणवीसांच्या घरी भेट देण्याची परवानगी नाकारली होती. आज नागपूरच्या हद्दीबाहेरच पोलिसांनी त्यांना रोखले. कारवाईसाठी पोलीस आले असताना नितीन देशमुख हे जमिनीवर झोपले. अशा अवस्थेत पोलिसांनी त्यांचे हात पाय धरले आणि त्यांना उचलून नेलं.

नागपूरच्या वेशीवर काय घडलं?

10 एप्रिल पासून अकोल्याहून निघालेले आमदार नितीन देशमुख आज नागपूरच्या वेशीवर पोहोचले. पोलिसांनी नागपूरच्या हद्दीवरच ही संघर्षयात्रा थांबवली. आमदार देशमुख आणि इतर आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केलं. सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नागपूरच्या वेशीवर वडधान्ना येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दत्तवाडी परिसरातही पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात होती. पोलिसांनी संघर्षयात्रेला पुढे जाण्यास मज्जाव केला. फडणवीस यांच्या घरापर्यंत जाण्याची परवानगी आंदोलकांनी माहिती होती. मात्र ही मागणी फेटाळून लावली. आमदार नितीन देशमुख यांच्यासह आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केलं. अखेर पोलिसांनी नितीन देशमुख यांचे दोन हात आणि दोन पाय पकडून अक्षरशः उचलून नेलं.

संजय राऊत यांचं ट्विट..

आमदार नितीन देशमुख यांना दिलेल्या वागणुकीनंतर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिलंय.. पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुखना अटक झाली.नागपूरचा हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले. खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले.आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटका केल्या. महाराष्ट्र जणू मोगलाई अवतरली .. सरकार जनतेलाच घाबरु लागले!

नितीन देशमुख यांचा इशारा..

अकोला आणि अमरावती येथील जनतेला खारं पाणी प्यावं लागतं. ही समस्या घेऊन आम्ही फडणवीसांकडे निघालो होतो. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवणार, असा इशारा नितीन देशमुख यांनी दिलाय. तर पाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी जाऊन आंदोलनदेखील करू, असा इशारा आंदोलकांनी दिलाय.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार