AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING साताऱ्यातील मीरगावात दरड कोसळली, दहा जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील मीरगावात दरड कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला आहे, गुरुवारी रात्री अकरा वाजता दरड कोसळली होती

BREAKING साताऱ्यातील मीरगावात दरड कोसळली, दहा जणांचा मृत्यू
Satara Mirgaon landslide
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 8:14 PM
Share

सातारा : सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील मीरगावात (Mirgaon Satara) दरड कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला आहे, गुरुवारी रात्री अकरा वाजता दरड कोसळली होती, त्यामुळे घरे जमीनदोस्त झाली, काल गावातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविले असता तरी ढिगा-याखाली अडकलेल्या लोकांना मीरगावात जेसीबी सारखे मशनरी किंवा अन्य कोणतीच आली नसल्यामुळे काढण्यात यश आले नाही. शिवाय वर जोरदार पाऊस सुरू होता , आता ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन जणांचे मृतदेह काढले आहेत , उर्वरित सात जणांचे मृतदेह काढले जात आहेत.

काल दिवसभर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी जेसीबी गावात पोहोचू शकली नाही. मीरगावात मोटारसायकल पोहोचणे सुद्धा मुश्किल आहे. तब्बल 40 तासांनंतर गावात दुपारी 3 वाजता जेसीबी दाखल.  त्याच्याआधी स्थानिक नागरिक करत होते. मृतदेह शोधण्यासाठी भरपावसात शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मीरगावात नेमकं काय घडलं?

जमीनदोस्त झालेल्या घरात मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. काल ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना पावसामुळे काढता आले नाही. गुरुवारी रात्री 11 वाजता कोसळली होती दरड. दुसऱ्या दिवशी प्रशासनाला कळले. मीरगावात लोक रात्री जीवांच्या आकांताने ओरडत होते. दरड कोसळताना काही जण पळून गेले आणि जी लोक राहिली ती दबली गेली.

काल प्रशासनाने प्रयत्न केले मात्र पावसामुळे बचावकार्य सुरुच झालं नाही. या गावात जेसीबी सारख्या यंत्रणा येणे अशक्य आहे. गावातील 200 लोकांना वनविभाग आणि स्थानिकांनी उशिरा सुरक्षितस्थळी हलविले.

मीरगाव कोयना धरण क्षेत्रातील गाव आहे. मीरगावासह अन्य गावांचा  संपर्क तुटला आहे. अडीच किलोमीटर कोयनेच्या बॅक वॉटर आणि त्यानंतर दीड किलोमीटर डोंगरावर चढून मीरगावात टीव्ही9 मराठीची टीम दाखल झाली. या गावात मोबाईल बंद आहेत,वीज कनेक्शन चार दिवसांपासून बंद आहे.

 होत्याचे नव्हते झाले

कोयनानगर परिसरातल्या ज्या दरडाच्या पायथ्याशी गेल्या कित्येक वर्षापासून सुखाने संसार करणाऱ्या लोकांचे क्षणात होत्याचे नव्हते झाले आहे, दरड घरावर  कोसळल्यामुळे जमीन घरे जमीनदोस्त झाली आहेत, लोकांनी गाव सोडून स्थलांतरित केलय, तर संसारोपयोगी साहित्य रस्त्यावर पडली आहेत, ज्या  दरडाच्या पायथ्याशी आम्ही खेळलो बागडलो तू दरड आमचा काळ म्हणून येईल असं आम्हाला वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शेवंताबाई बाकाडे आणि देवजी बाकाडे यांचे पुत्रांनी  व्यक्त केली आहे.

VIDEO : साताऱ्यात दरड कोसळली, दहा जणांचा मृत्यू

Follow Us
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.