नाणार (Nanar) रिफायनरीवरून तळकोकणात राजकारण (Politics) तापलं असून नितेश राणे (Nitesh Rane) विरोधात शिवसेना असा जोरात सामना रंगला आहे. नाणारवरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्यानंतर सतीश सावंत यांनी नितेश राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे. रिफायनरी रद्द करायला लावणार, असे सांगणाऱ्या नितेश राणेंची भूमिका आता का बदलली? 2017-18मध्ये रिफायनरीला विरोध म्हणून नितेश राणेंनी लोकांना घंटानाद करायला लावला होता. रिफायनरीमुळे कॅन्सर होईल, आंबा, काजूला नुकसान होईल, अशी वक्तव्ये करणारे नितेश राणे जसे दोन दोन वर्षांनी पक्ष बदलता आहेत तशा भूमिका बदलत आहेत. भूमिका बदलून लोकांची दिशाभूल केल्यामुळे नितेश राणेंनी जाहीर माफी मागावी. नितेश राणे टायगर नाहीत तर भालू (अस्वल) आहेत. टायगर इज बॅक नाहीतर भालू इज बॅक. सुपारी देणे आणि दहशत माजवणे यापलीकडे नितेश राणेंचे व्हिजन नाही, असे जहाल आसूड सावंत यांनी नितेश राणेंवर ओढले आहेत.