AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका

1936 पासून पर्यटकांसाठी उघडे असलेले हे आश्रम कोरोनाच्या संकटात पर्यटकांसाठी गेल्या पाच महिन्यापासून बंद आहे

सेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Sep 27, 2020 | 9:14 PM
Share

वर्धा : जगात शांततेचं प्रतीक म्हणून महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमची ओळख आहे (Sevagram Ashram Is In Loss). येथे आल्यावर शांतता आणि अहिंसेचा संदेश मिळतो. मात्र, सध्या इथे निरव शांतता दिसते आहे. याला कारणही तसेच आहे. 1936 पासून पर्यटकांसाठी उघडे असलेले हे आश्रम कोरोनाच्या संकटात पर्यटकांसाठी गेल्या पाच महिन्यापासून बंद आहे. या काळात आश्रमाला पर्यटनापासून मिळणारी मिळकत थांबल्याने जवळपास 40 लाखांचा फटका बसल्याची माहिती आहे (Sevagram Ashram Is In Loss).

सेवाग्राम आश्रम मार्च महिन्यापासून बंद करण्यात आले आहे. या काळात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये देशभरातून नागरिक आश्रमाला भेट द्यायला येतात. शाळेच्या सहली या ठिकाणी होतात. महात्मा गांधींचे विचार, हाडा मासाचा माणूस ज्याने कुठलेही शस्त्र न घेता देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या महात्म्याची ताकद, सत्य व अहिंसा समजण्यासाठी नागरिक या आश्रमात येतात. खास करुन परदेशातील मंडळी महात्मा गांधींच्या विचारांचा आभ्यास करण्यासाठी या ठिकाणी येतात. मात्र, लॉकडाऊनमुळे हे सर्व बंद झाले आहे.

शेतीतून आश्रमाला मदत होते. यातून मिळणारे अन्न, धान्य, वस्तू यासह काही देणगीदारांकडूनही मदत होते. सेवाग्राम आश्रमाचे आहार केंद्र, यात्री निवास, पुस्तकालय, खादी उत्पादन वस्त्र, गोशाळा अशे मिळकतीचे स्रोत आहे. पण, पर्यटक किंवा दर्शनार्थी न आल्याने मोठ्या प्रमाणात तूट झाली असल्याची माहिती आश्रम प्रतिष्ठानचे सचिव मुकुंद मस्के यांनी दिली (Sevagram Ashram Is In Loss).

दरवर्षी सेवाग्राम आश्रमाला साधारण 4 ते 5 लाख पर्यटक भेटी देतात. यामध्ये विदेशी पर्यटकांचासुद्धा समावेश आहे. गांधीजींना समजून घेणे, त्यांची दिनचर्या जाणून घेण्यासाठी पर्यटक यात्री निवासात मुक्काम करतात. यात्री निवासात जेवणाचीही व्यवस्था आहे. येथे जवळपास 4 ते 5 हजार विदेशी पर्यटक येतात आणि अभ्यासासाठी राहतात. पण, लॉकाडाऊनमुळे ना कोणी आले, ना थांबले. यामुळे आश्रमाचे चालणारे अर्थचक्राचे चाक फिरलेच नाही.

Sevagram Ashram Is In Loss

संबंधित बातम्या :

आधी रिपोर्टमध्ये रुग्णाचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह, नंतर प्लाझ्मा थेरपी करताना एबी पॉझिटिव्ह, खाजगी लॅबचा धक्कादायक प्रताप

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत