AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar | पवारांचं ते कोणतं वाक्य होतं, ज्यामुळे भाजप-शिवसेनेत अंतर वाढलं, आणि भाजपचा घात झाला, ऐका पवारांकडून

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन होतानाची तत्कालीन परिस्थिती तसेच त्यावेळचे डावपेच यावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी माझ्या एका वाक्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढलं होतं असं सांगितलंय.

Sharad Pawar | पवारांचं ते कोणतं वाक्य होतं, ज्यामुळे भाजप-शिवसेनेत अंतर वाढलं, आणि भाजपचा घात झाला, ऐका पवारांकडून
SHARAD PAWAR
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 1:24 PM
Share

मुंबई : राज्याच्या राजकारणात कधीही शक्य नसलेलं सत्तासमिकरण अस्तित्वात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तिन्ही पक्ष सत्ताशकट मोठ्या कौशल्याने हाकत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन होतानाची तत्कालीन परिस्थिती तसेच त्यावेळचे डावपेच यावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी माझ्या एका वाक्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढलं होतं असं सांगितलंय.

शरद पवार यांचं ते एक वाक्य कोणतं ?

लोकसत्ता वर्तमानपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करतानाची परिस्थिती तसेच त्यावेळी काय घडामोडी घडल्या याबाबत सांगितलं. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून धडपड सुरु होती. तर दुसरीकडे शिवसेना मुख्यंत्रिपदावर अडून बसली होती. यावेळी सरकार स्थापन्यासाठी भाजपला बहुमताचा अकडा गाठण्यासाठी जिकरीचे होऊ लागले. याच गोष्टीचा फायदा घेत शरद पवार यांनी मोठा राजकीय डाव टाकला. याच राजकीय खेळीबद्दल त्यांनी भाष्य केलं. “देवेंद्र फडणवीस यांना बहुमतासाठी काही लोकांची मदत हवी असेल तर आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करु, असे मी त्यावेळी म्हणालो होते. ते माझं एक वाक्य शिवसेना तसेच भाजपमध्ये अंतर वाढवण्यासाठी महत्त्वाचं ठरलं,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

असं अर्धवट काम सोडलं नसतं

याचबरोबर पवार यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी कार्यक्रमाबाबतही भाष्य केलं. मी अजित पवार यांना शपथेसाठी पाठवलं नव्हतं. मी पाठवलं असतं तर सरकार स्थापनच केलं असतं. असं अर्धवट काम सोडलं नसतं, असं शरद पवार म्हणाले. अजित पवार यांनी फडणवीस यांच्यासोबत शपथविधी घेतला होता. यामागे शरद पवार यांचा हात असल्याचं म्हटलं जातं. त्यांच्या वरील वक्तव्यानंतर आता शरद पवार यांची यामध्ये कोणतीही भूमिका नव्हती हे स्पष्ट झालं आहे.

दरम्यान,  शरद पवार यांचा राकारणातील अनुभव पाहता ते या क्षेत्रातील चाणक्य आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितल्याप्रमाणे त्यांच्या एका वाक्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर वाढत गेले. त्यानंतर शिवसेनेची राष्ट्रवादी तसेच काँग्रेससोबत जवळीक वाढली. परिणामी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.

इतर बातम्या :

Mumbai Section 144 | मुंबईकरांनो लक्ष द्या, शहरात आठ दिवसांची जमावबंदी, न्यू इयर पार्ट्यांनाही चाप

Akshay Kardile Wedding | भाजप नेते शिवाजी कर्डीलेंच्या घरी सनई चौघडे, मुलगा अक्षय कर्डीलेंचा शाही थाटात विवाह

फडणवीसांसोबत सरकार बनवण्यासाठी तुम्हीच अजित पवारांना पाठवलं होतं का? शरद पवारांची पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?