AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मैत्रिणींसोबत घरात शिरली, काकूंचे दागिने ओरबाडले, आरडाओरड होताच केलं असं काही… परिसरात खळबळ

बोल्हेगाव परिसरात ४० वर्षीय मनीषा शिंदे यांची सोन्याच्या दागिन्यांसाठी निर्घृण हत्या करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने दोन अल्पवयीन मुलींसह चार जणींच्या टोळीला अटक करून या प्रकरणाचा छडा लावला. लालसेपोटी हा क्रूर गुन्हा घडल्याचे उघड झाले आहे.

मैत्रिणींसोबत घरात शिरली, काकूंचे दागिने ओरबाडले, आरडाओरड होताच केलं असं काही... परिसरात खळबळ
women aresst
| Updated on: Dec 16, 2025 | 5:37 PM
Share

दागिन्यांच्या लालसेपोटी एका ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमधील बोल्हेगाव परिसरात घडली आहे. या गुन्ह्यात दोन अल्पवयीन मुलींसह चार जणींच्या टोळीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या चौघींना अटक करून संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे. ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर या ठिकाणीच्या बोल्हेगाव येथे राहणाऱ्या मनीषा शिंदे (४०) यांचा त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. यानंतर अत्यंत कमी वेळात या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद केले.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. मनीषा शिंदे यांचा खून एखाद्या सराईत गुन्हेगाराने नव्हे, तर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या युवतीने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले. या खुनाचा मुख्य सूत्रधार दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे (२०) ही तरुणी असल्याचे उघड झाले आहे. दिव्याचे माहेर मयत मनीषा शिंदे यांच्या घराशेजारीच आहे. मनीषा शिंदे यांच्याजवळ सोन्याचे दागिने आहेत, याची दिव्याला माहिती होती. याच माहितीच्या आधारे तिने चोरीचा कट रचला.

हा कट रचल्यानंतर दिव्या खाडे हिने तिची साथीदार अंजुम सैफी आणि दोन अल्पवयीन मुलींना सोबत घेतले. चोरीच्या उद्देशाने या चौघींनी मनीषा शिंदे यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिने बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मनीषा शिंदे यांनी जोरदार आरडाओरड करण्यास सुरुवात केली. पण आपण पकडले जाऊ या भीतीने या चौघींनी ब्लेडने मनीषा शिंदे यांच्या गळ्यावर वार केले. यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला.

नागरिकांमध्ये मोठी चिंता

मनीष यांचा खून केल्यानंतर त्यांनी दागिने घेऊन तिथून पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे तपास करत या चौघींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी दागिन्यांच्या लालसेपोटी मनीषा शिंदे यांचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणात दिव्या खाडे, अंजुम सैफी आणि दोन अल्पवयीन मुलींना अटक केली आहे. या घटनेमुळे, विशेषतः अल्पवयीन मुलींचा सहभाग असल्याने, परिसरातील पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे.

Follow Us
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...