AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मैत्रिणींसोबत घरात शिरली, काकूंचे दागिने ओरबाडले, आरडाओरड होताच केलं असं काही… परिसरात खळबळ

बोल्हेगाव परिसरात ४० वर्षीय मनीषा शिंदे यांची सोन्याच्या दागिन्यांसाठी निर्घृण हत्या करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने दोन अल्पवयीन मुलींसह चार जणींच्या टोळीला अटक करून या प्रकरणाचा छडा लावला. लालसेपोटी हा क्रूर गुन्हा घडल्याचे उघड झाले आहे.

मैत्रिणींसोबत घरात शिरली, काकूंचे दागिने ओरबाडले, आरडाओरड होताच केलं असं काही... परिसरात खळबळ
women aresst
| Updated on: Dec 16, 2025 | 5:37 PM
Share

दागिन्यांच्या लालसेपोटी एका ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमधील बोल्हेगाव परिसरात घडली आहे. या गुन्ह्यात दोन अल्पवयीन मुलींसह चार जणींच्या टोळीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या चौघींना अटक करून संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे. ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर या ठिकाणीच्या बोल्हेगाव येथे राहणाऱ्या मनीषा शिंदे (४०) यांचा त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. यानंतर अत्यंत कमी वेळात या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद केले.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. मनीषा शिंदे यांचा खून एखाद्या सराईत गुन्हेगाराने नव्हे, तर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या युवतीने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले. या खुनाचा मुख्य सूत्रधार दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे (२०) ही तरुणी असल्याचे उघड झाले आहे. दिव्याचे माहेर मयत मनीषा शिंदे यांच्या घराशेजारीच आहे. मनीषा शिंदे यांच्याजवळ सोन्याचे दागिने आहेत, याची दिव्याला माहिती होती. याच माहितीच्या आधारे तिने चोरीचा कट रचला.

हा कट रचल्यानंतर दिव्या खाडे हिने तिची साथीदार अंजुम सैफी आणि दोन अल्पवयीन मुलींना सोबत घेतले. चोरीच्या उद्देशाने या चौघींनी मनीषा शिंदे यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिने बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मनीषा शिंदे यांनी जोरदार आरडाओरड करण्यास सुरुवात केली. पण आपण पकडले जाऊ या भीतीने या चौघींनी ब्लेडने मनीषा शिंदे यांच्या गळ्यावर वार केले. यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला.

नागरिकांमध्ये मोठी चिंता

मनीष यांचा खून केल्यानंतर त्यांनी दागिने घेऊन तिथून पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे तपास करत या चौघींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी दागिन्यांच्या लालसेपोटी मनीषा शिंदे यांचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणात दिव्या खाडे, अंजुम सैफी आणि दोन अल्पवयीन मुलींना अटक केली आहे. या घटनेमुळे, विशेषतः अल्पवयीन मुलींचा सहभाग असल्याने, परिसरातील पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे.

Follow Us
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी.
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय.
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट...
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट....
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल.
नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! भागातील सर्व CCTV फुटेज...
नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! भागातील सर्व CCTV फुटेज....
नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या तोंडातून... शवविच्छेदन अहवालातून थक्क
नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या तोंडातून... शवविच्छेदन अहवालातून थक्क.
फास्टट्रॅक म्हणजे नेमकं काय? सरकारने व्याख्या सांगावी....
फास्टट्रॅक म्हणजे नेमकं काय? सरकारने व्याख्या सांगावी.....
अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप.....
अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप......