AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार कधीच अस्वस्थ झाले नाहीत, ते नेहमी बिनधास्त… नारायण राणे यांचा खोचक टोला

narayan rane on sharad pawar: मी काही लोकांचा अभ्यास केला आहे. माणसाला आजकाल हवामानामुळे अस्वस्थ झाला की 50 ते 55 वर्षात अटॅक येतो. परंतु शरद पवार नेहमी बिनधास्त राहतात. शरद पवार हे जगात कोणतेही संकट आले तरी अस्वस्थ झाले नाहीत, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

शरद पवार कधीच अस्वस्थ झाले नाहीत, ते नेहमी बिनधास्त... नारायण राणे यांचा खोचक टोला
narayan rane and sahrad pawar
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 02, 2024 | 10:17 AM
Share

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान असलेल्या मतदार संघात बड्या बड्या नेत्यांच्या सभा होत आहे. ऊन तापत असताना आरोप-प्रत्यारोपाने राजकीय वातावरणही तापत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच पुण्यात सभा झाली होती. या सभेत त्यांनी शरद पवार भटकती आत्मा असल्याची टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी जोरदार पलटवार केला होता. मी स्वार्थासाठी नव्हे तर शेतकऱ्याचे दुखणे मांडण्यासाठी अस्वस्थ आहे, असा हल्ला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला होता. महागाईबाबत भूमिका मांडताना 100 वेळा अस्वस्थता दाखवेन, असे ते म्हणाले होते. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. शरद पवार कधीच अस्वस्थ झाले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले नारायण राणे

सिंधुदुर्गमध्ये बोलताना नारायण राणे यांनी म्हटले की, शरद पवार हे एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर 84 वर्ष जगले नसते. ते अस्वस्थ कधीच नसतात. ते बिनधास्त असतात. ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. बारा वर्ष केंद्रीय मंत्री राहिले. संरक्षण मंत्री दोन वर्षे राहिले. त्यानंतरही काहीच करु शकले नाही. त्यांनी आतापर्यंत अनेक पद भोगली तरी जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत. आता अस्वस्थपणा का जाणवतो, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.

मित्र म्हणू नका, पण….

मी काही लोकांचा अभ्यास केला आहे. माणसाला आजकाल हवामानामुळे अस्वस्थ झाला की 50 ते 55 वर्षात अटॅक येतो. परंतु शरद पवार नेहमी बिनधास्त राहतात. शरद पवार हे जगात कोणतेही संकट आले तरी अस्वस्थ झाले नाहीत. ते नरेंद्र मोदी यांना म्हणतात, तुमचे सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता जाणार नाही. परंतु आमचे सरकार जाणार नाही. आता आमचे 400 खासदार निवडून येणार आहेत. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत.

एकीकडे मोदी साहेब शरद पवार यांना मित्र म्हणतात. परंतु दुसरीकडे शरद पवार नेहमी त्यांच्यावर टीका करतात. मित्राला चांगले म्हणता येत नाही तर नका म्हणू. परंतु वाईट तरी नको बोलू, असा टोला नारायण राणे यांनी शरद पवार यांना लगावला.

Follow Us
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?
7 खासदार फुटणार? चर्चांना उधाण; ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ते खासदार..
मोठी बातमी! 7 खासदार फुटणार? चर्चांना उधाण; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ते खासदार....
महागाईचा तडाखा सुरूच! CNG-PNG दरात तिसऱ्यांदा मोठी वाढ
Fuel Price Hike | महागाईचा तडाखा सुरूच! CNG-PNG दरात तिसऱ्यांदा मोठी वाढ, सर्वसामान्य हैराण!
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा