AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ वाढवण्यासाठी नाव बदलले जाते”; नामांतर प्रकरणावरून माकप नेत्याने भाजपच्या वर्मावरच घाव घातला

नव्या संसदेच्या उद्घाटनावरूनही त्यांनी मोदी सरकावर लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, नवीन इमारत बनवून उपयोग नाही तर संसदेचे कार्य मजबूत व्हायला हवे असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ वाढवण्यासाठी नाव बदलले जाते; नामांतर प्रकरणावरून माकप नेत्याने भाजपच्या वर्मावरच घाव घातला
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Jun 01, 2023 | 8:43 PM
Share

सोलापूर : सध्या देशाच्या राजधानीमध्ये महिला कुस्तीपटू ब्रिजभूषण यांच्याविरोधात जोरदार आंदोलन करत आहेत. त्यावरून आता देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यावरूनच आता माकपचे महासचिव सीताराम येचूरी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल चढविला आहे. दिल्लातीत महिला कुस्तीपटूंचा चाललेल्या आंदोलनावरून त्यांनी केंद्रावर टीका केली आहे. देशातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या गेलेले पैलवान त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे सांगत ते आता रस्तावर उतरत आहेत तरीही सरकार गप्प असल्याची टीका त्यांनी केली आहे.

याआधी पंतप्रधान त्यांचे कौतुक करत होते मात्र आज त्यांच्याबद्दल काही बोलत नाहीत. तसेच सुप्रीम कोर्टने आदेश देऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

एकीकडे खेळाडू आंदोलन करत होते आणि दुसरीकडे पंतप्रधान राज्याभिषेक असल्याप्रमाणे सेंगोल घेऊन संसदेत बसवत होते अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. वास्तविक पाहता राजे लोकांचा राज्याभिषेक होताना सेंगोल बसवला जातो असंही त्यांनी यावेळी त्यांनी बोलून दाखवले.

सीताराम येचूरी यांनी केंद्र सरकावर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, 2022 मध्ये फक्त 56 दिवस संसद भरली होती तर पूर्वी 212 दिवस संसद भरत असायची असा घणाघातही त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

यावेळी त्यांनी सरकारवर टीका करताना म्हणाले की, कायदे बनविण्यासाठी एक कमिटी असायची मात्र आता सगळे बदलले आहे. कारण सध्या कोणत्याही कायद्यावर चर्चा न होताच कोणतेही बील पास केले जाते असं म्हणत त्यांनी भाजप सरकारच्या कामावरही जोरदार निशाणा साधला आहे.

यावेळी त्यांनी नव्या संसदेच्या उद्घाटनावरूनही त्यांनी मोदी सरकावर लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, नवीन इमारत बनवून उपयोग नाही तर संसदेचे कार्य मजबूत व्हायला हवे असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

Follow Us
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह! बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल... शिवसेनेच्या कोर्टातील निकालाआधीच मोठा बॉम्ब
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता... बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस.
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'-ज्योति वाघमारे
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुजय विखे आक्रमक
'ट्रम्प सारखा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही'-सुजय विखे
१६ ऑगस्ट २०२६ च्या ठळक बातम्या: महिला आरक्षण, देशातील प्रमुख घडामोडी
१६ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख घडामोडी
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक, प्रवाशांना उशीर
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस