AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदर्श शाळा घडवलेल्या शिक्षकांच्या बदलीने चिमुकले रडू लागले, अनेक विद्यार्थी झाले भावुक

आसरअली येथील जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक खुर्शीद शेख यांच्या बदलीमुळे शाळेतील विद्यार्थी भावुक झाले. दहा वर्षे शाळेत काम करून, शाळेची पटसंख्या वाढवून आणि तिला मुख्यमंत्री आदर्श शाळाचा दर्जा मिळवून देऊन त्यांनी अद्भुत काम केले आहे.

आदर्श शाळा घडवलेल्या शिक्षकांच्या बदलीने चिमुकले रडू लागले, अनेक विद्यार्थी झाले भावुक
आदर्श शाळा घडवलेल्या शिक्षकांच्या बदलीने चिमुकले रडू लागले
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jan 08, 2025 | 8:46 PM
Share

गडचिरोली जिल्ह्यातील असरअली येथील जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षकांच्या बदलीनंतर विद्यार्थी रडू लागले. खुर्शीद शेख नावाच्या शिक्षकाने 10 वर्षाच्या कालावधीत अनेक विद्यार्थी घडविले. त्यांच्या बदलीमुळे जिल्हा परिषद आसरअली येथील शाळेत अनेक विद्यार्थी भावूक झाले. ब्रिटिशांनी स्वतंत्र्याआधी 1914 मध्ये सिरोंचा तालुक्यातील आसरअली येथे ही जिल्हा परिषद शाळा सुरु केली होती. या आसरअली जिल्हा परिषद शाळेला 110 वर्ष पूर्ण झाले आहेत. खुर्शीद शेख हे शिक्षक इथे येण्याआधी या शाळेत जवळपास 74 विद्यार्थ्यांची पटसंख्या होती. शिक्षकांच्या मेहनतीमुळे सध्या या शाळेत 232 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शिक्षकाची नियुक्ती 2014 मध्ये करण्यात आल्यानंतर त्यांनी 10 वर्ष मेहनत घेत शाळेला मुख्यमंत्री आदर्श शाळेच्या क्रमांक पटकावून दिला

गेल्या 10 वर्षात खुर्शीद शेख यांनी या अति संवेदनशील नक्षलग्रस्त भागातील शाळेला डिजीटल शाळा म्हणून जिल्ह्यासह विदर्भात ओळख निर्माण केली. याची राज्य सरकारने दखल घेत राष्ट्रपती आदर्श पुरस्कार खुर्शीद शेख यांना प्रदान करण्यात आला. यानंतर शासनाने शेख यांची बदली नागेपली जवळील एका शाळेत करण्यात आली आहे.

बदलीनंतर विद्यार्थ्यांना न सांगताच शिक्षक निघून गेले

माझी बदली झाली हे विद्यार्थ्यांना कळाल्यास विद्यार्थी शाळेतून जाण्यास सोडणार नाही म्हणून न सांगताच खुर्शीद शेख यांनी शाळेला निरोप दिला. एक महिन्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना शेख शिक्षकांचे स्थलांतर झाल्याची बातमी कळल्यानंतर अनेक विद्यार्थी भावुक होऊन रडू लागले.

‘ते आमचे शिक्षक नाही तर आमचे बाबा’

चिमुकल्यांनी ते आमचे शिक्षक नाही तर आमचे बाबा होते. त्यांनी आम्हाला वडिलांसारखं प्रेम आणि आदर्श शिक्षण दिलं. तसेच त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकण्यासारखं मिळालं, अशी प्रतिक्रिया चिमुकल्यांनी दिली. यावेळी चिमुकल्या विद्यार्थिंनीना खूप रडू येत होतं. दरम्यान, या शाळेत आता काम करणारे शिक्षकही शेख यांना एक आदर्श शिक्षक मानायचे. खुर्शीद शेख यांची बदली झाली. पण त्यांचे प्रेम नेहमीच आसरअली येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मनात राहणार आहे.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!