AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पटोलेंची अजितदादा, शिंदेंना ऑफर; मुनगंटीवारांनी एका वाक्यात विषय संपवला म्हणाले…

नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे.

पटोलेंची अजितदादा, शिंदेंना ऑफर; मुनगंटीवारांनी एका वाक्यात विषय संपवला म्हणाले...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 15, 2025 | 5:36 PM
Share

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. मला वाटतं हा धुलिवंदनाचा जोक असावा, त्यांच्याकडे फक्त 46 आमदार आहेत, अतिशय चांगलं काम करणाऱ्या दोन उपमुख्यमंत्र्यांना संशयाच्या वातावरणात गुंतवायचं, जनता देखील काँग्रेसला सिरियसली घेत नाही तुम्ही देखील घेऊ नका, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली. या प्रकरणात निरीक्षण नोंदवताना न्यायालयानं असं म्हटलं की जर कोकाटे यांना शिक्षा झाली तर त्यांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घ्यावी लागले, आणि त्यावर जनतेचा पैसा खर्च होईल. यावर देखील सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाने कुठल्या आधारावर निरीक्षण नोंदवलं माहीत नाही, पण निवडणुका घ्यायच्या, नाही घ्यायच्या, त्याबाबतचा खर्च हा निवडणूक आयोगाचा विषय आहे, उद्या कोर्ट पैसे वाचतील म्हणून पाच वर्षांऐवजी दहा वर्षांनी निवडणूक घ्या असं म्हणणार आहे का? त्यामुळे जी केस आहे त्याबाबतच कोर्टाचं निरीक्षण असावं, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षावर नाराज असून, ते भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. मला जे माहीत आहे त्याप्रमाणे जयंत पाटलांनी पक्ष बदलण्याचा कधीही विचार केलेला नाही, दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीबाबत अशा बातम्या वारंवार चालवून त्याला अडचणीत आणण्याचं काम होतं आहे, संयमित लोकशाही ही स्वैराचारी लोकशाहीकडे जात आहे आणि हे भविष्यासाठी धोकादायक आहे, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान शेतकरी आत्महत्यावर बोलताना  एका जरी शेतकऱ्याची आत्महत्या झाली तरी आम्ही सर्वांनी चिंतन केलं पाहिजे, विधानसभेत पूर्ण एक दिवस शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.