AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : अजित दादांची आठवण येताच सुनेत्रा पवारांना अश्रु अनावर, बीडमध्ये ध्वजारोहण केल्यानंतर म्हणाल्या…

Sunetra Pawar : महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथे ध्वजारोहण केल्यानंतर अजित पवार यांच्या आठवणीत पालकमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्या होत्या. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्याचा विकास करण्याचे अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे म्हटले.

Video : अजित दादांची आठवण येताच सुनेत्रा पवारांना अश्रु अनावर, बीडमध्ये ध्वजारोहण केल्यानंतर म्हणाल्या...
Sunetra Pawar EmotionalImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: May 01, 2026 | 3:48 PM
Share

आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्याच्या विविध भागात काही खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण केले. बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनीही आज बीडमध्ये ध्वजारोहण केले. यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी अजित दादांची आठवण येतात त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. यानंतर बोलताना सुनेत्रा पवार यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

सुनेत्रा पवार यांना अश्रु अनावर

आज सुनेत्रा पवार यांनी बीडमधील कवायत मैदान, पोलीस मुख्यालय येथे ध्वजारोहण केले. यानंतर बोलताना सुनेत्रा पवार यांनी अजित दादांच्या आठवणीत अश्रु अनावर झाले. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी म्हटले की, ‘सर्वांना महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बौध्द पौर्णिमेच्या शुभेच्छा. सर्व शहिदांना श्रद्धांजली आणि कृतज्ञता. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना माझे अभिवादन. बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा दादांनी संकल्प केला होता. आदरणीय अजित दादांनी अनेक निर्णय घेतले. जिल्हाला ते एक वेगळी दिशा देतील असं वाटलं होतं. आता बीड जिल्ह्याचं स्वप्न पूर्ण करण्याची आणि विकासात्मक कामे करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे.’

बीड जिल्ह्यासाठी 623 कोटींचा निधी

पुढे बोलताना सुनेत्रा पवार यांनी, ‘आपल्या सर्वांना आवाहन करते, आपण सर्वजण एकत्र येऊन विकासात्मक काम करू. स्वाराती रूग्णालयाचा विकास होणार आहे. बीड जिल्ह्यासाठी 623 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. जनगणनेसाठी येणाऱ्यांना आपण सर्वांनी सहकार्य करायचे आहे. जनगणनेच्या या प्रक्रियेमध्ये सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवून आपलं योगदान द्यावं. सर्व क्षेत्रात अग्रगण्य जिल्हा बनवूया’ असं आवाहन बीडकरांना केलं आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे अजित पवार यांच्याकडे होते. मात्र अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर बीडचे पालकमंत्रीपद रिक्त झाले होते. अजित दादांच्या निधनानंतर काही दिवसांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आज पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी बीडमध्ये ध्वजारोहण केले. आता आगामी काळात बीडच्या विकासाची जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांच्यावर असणार आहे.

Follow Us
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
Nagpur | शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा!
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक
Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; चाकणकरांच्या
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?
राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?