AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय शिरसाट 72 मजल्यावर कसा पोहोचला?, सगळी लफडी बाहेर काढतो; चंद्रकांत खैरे यांचा इशारा

लोकसभा निवडणुकीचं रण तापलेलं असताना संभाजीनगरमध्ये मात्र आरोपप्रत्यारोपाच्या तोफा धडधडताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे संजय शिरसाट आमनेसामने आले आहेत. संजय शिरसाट यांच्या टीकेला उत्तर देताना खैरे यांनी त्यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. संजय शिरसाट यांची सर्व लफडी बाहेर काढतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

संजय शिरसाट 72 मजल्यावर कसा पोहोचला?, सगळी लफडी बाहेर काढतो; चंद्रकांत खैरे यांचा इशारा
| Updated on: May 01, 2024 | 3:05 PM
Share

ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी यांनी शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हा हल्लाबोल करताना खैरे यांनी शिरसाट यांचा एकेरी उल्लेख केला. संजय शिरसाट यांची सगळी लफडी बाहेर काढतो. 72 मजल्यावर कसा गेला ते पाहतो. आता त्याला सोडणार नाही. त्याच्यासाठी मी अडीच हजार फोन केले, तेव्हा तो निवडून आला. आता तो मस्तीत आला आहे. भुमरेकडे काय मिळेल ते काढून घेण्यासाठी गेला आहे, अशी जोरदार टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

चंद्रकांत खैरे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला आहे. संजय शिरसाट गद्दार आहेत. त्यांच्याकडे अमाप पैसा आला आहे. त्यामुळे ते दादागिरी करत आहेत, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली. आपण आपल्या धर्माचा आदर आणि पूजा पाठ केला पाहिजे. भाईचारा पाळला पाहिजे. दंगली होता कामा नये. सर्वांनी प्रेमानं राहिलं पाहिजे. आता या वक्तव्यावर काही बोलू नका. आता निवडणूक आहेत. पुन्हा तेच दिवसभर चालत राहतं. धर्म पाळला की संसार शांततेत चालतो, असंही खैरे म्हणाले.

10 मे रोजी उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये

6 मेला आदित्य ठाकरे आणि 10 मे रोजी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. सध्या खूप धावपळ सुरू आहे, असंही ते म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची सभा होणार असल्याने या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.

तो दिवस लवकर यावा

दरम्यान, बेळगाव संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट करा अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. अनेकांनी बलिदान दिले, त्यामुळे आजचा दिवस पाहायला मिळाला हा महत्वाचा दिवस आहे. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. भाषेच्या अनुषंगाने राज्यांची निर्मिती झाली. बेळगाव, बिदर, असे अनेक भाग मराठी भाषिक भाग आहेत. त्यामुळं ते महाराष्ट्रात आला पाहिजे. त्यासाठी अनेक वेळा मागणी करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील त्याबाबत लढा दिला. तो दिवस लवकर यावा ही इच्छा आहे, असंही ते म्हणाले.

Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.