AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय शिरसाट 72 मजल्यावर कसा पोहोचला?, सगळी लफडी बाहेर काढतो; चंद्रकांत खैरे यांचा इशारा

लोकसभा निवडणुकीचं रण तापलेलं असताना संभाजीनगरमध्ये मात्र आरोपप्रत्यारोपाच्या तोफा धडधडताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे संजय शिरसाट आमनेसामने आले आहेत. संजय शिरसाट यांच्या टीकेला उत्तर देताना खैरे यांनी त्यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. संजय शिरसाट यांची सर्व लफडी बाहेर काढतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

संजय शिरसाट 72 मजल्यावर कसा पोहोचला?, सगळी लफडी बाहेर काढतो; चंद्रकांत खैरे यांचा इशारा
| Updated on: May 01, 2024 | 3:05 PM
Share

ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी यांनी शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हा हल्लाबोल करताना खैरे यांनी शिरसाट यांचा एकेरी उल्लेख केला. संजय शिरसाट यांची सगळी लफडी बाहेर काढतो. 72 मजल्यावर कसा गेला ते पाहतो. आता त्याला सोडणार नाही. त्याच्यासाठी मी अडीच हजार फोन केले, तेव्हा तो निवडून आला. आता तो मस्तीत आला आहे. भुमरेकडे काय मिळेल ते काढून घेण्यासाठी गेला आहे, अशी जोरदार टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

चंद्रकांत खैरे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला आहे. संजय शिरसाट गद्दार आहेत. त्यांच्याकडे अमाप पैसा आला आहे. त्यामुळे ते दादागिरी करत आहेत, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली. आपण आपल्या धर्माचा आदर आणि पूजा पाठ केला पाहिजे. भाईचारा पाळला पाहिजे. दंगली होता कामा नये. सर्वांनी प्रेमानं राहिलं पाहिजे. आता या वक्तव्यावर काही बोलू नका. आता निवडणूक आहेत. पुन्हा तेच दिवसभर चालत राहतं. धर्म पाळला की संसार शांततेत चालतो, असंही खैरे म्हणाले.

10 मे रोजी उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये

6 मेला आदित्य ठाकरे आणि 10 मे रोजी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. सध्या खूप धावपळ सुरू आहे, असंही ते म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची सभा होणार असल्याने या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.

तो दिवस लवकर यावा

दरम्यान, बेळगाव संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट करा अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. अनेकांनी बलिदान दिले, त्यामुळे आजचा दिवस पाहायला मिळाला हा महत्वाचा दिवस आहे. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. भाषेच्या अनुषंगाने राज्यांची निर्मिती झाली. बेळगाव, बिदर, असे अनेक भाग मराठी भाषिक भाग आहेत. त्यामुळं ते महाराष्ट्रात आला पाहिजे. त्यासाठी अनेक वेळा मागणी करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील त्याबाबत लढा दिला. तो दिवस लवकर यावा ही इच्छा आहे, असंही ते म्हणाले.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!