AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC Ward : केडीएमसीची प्रभाग रचना शिवसेनेच्या सोयीसाठी, मनसेनंतर भाजप आमदाराचे शिवसेनेवर टिकास्त्र

मनसे आमदार राजू पाटील यांनी ही प्रभाग रचना आधीच फुटली होती. शिवसेनेचे उमेदवारही ठरले आहेत असा गंभीर आरोप शिवसेनेवर केला आहे. आता या मुद्यावर भाजप आक्रमक झाली आहे. भाजपने पत्रकार परिषद घेत या प्रभाग रचनेसंदर्भात शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

KDMC Ward : केडीएमसीची प्रभाग रचना शिवसेनेच्या सोयीसाठी, मनसेनंतर भाजप आमदाराचे शिवसेनेवर टिकास्त्र
केडीएमसीची प्रभाग रचना शिवसेनेच्या सोयीसाठी, मनसेनंतर भाजप आमदाराचे शिवसेनेवर टिकास्त्र
Reporter Amjad Khan
Reporter Amjad Khan | Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Feb 02, 2022 | 5:33 PM
Share

कल्याण : मनसे आमदार राजू पाटील यांच्यानंतर भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केडीएमसीच्या प्रभाग रचने(KDMC Ward Structure)वरुन शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ही प्रभाग रचना शिवसेनेच्या सोयीसाठी केली गेली आहे. आम्ही हरकती घेणार, पुढे काय करायचे ते पण आम्ही निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया भाजप आमदार रविंद्र चव्हाण(Ravindra Chavan) यांनी दिली आहे. मात्र यांच्याकडे कोणता ही कामधंदा नाही. त्यांचा हाच अजेंडा आहे. काही चुकीचे असल्यास आम्हीही हरकत घेऊ. जे केले ते शिवसेनेने केले असे हे बोलत राहतात, असा पलटवार शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना जाहिर झाली. 133 प्रभागात सदस्य 44 पॅनलमधून निवडणूक लढविणार आहेत. हरकतीसाठी 14 फेब्रुवारीर्पयत वेळ दिला गेला आहे. या प्रभाग रचना जाहिर होताच राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. (BJP MLA criticizes Shiv Sena over KDMC ward formation)

प्रभाग रचनेवरुन मनसेनंतर आता भाजपही आक्रमक

मनसे आमदार राजू पाटील यांनी ही प्रभाग रचना आधीच फुटली होती. शिवसेनेचे उमेदवारही ठरले आहेत असा गंभीर आरोप शिवसेनेवर केला आहे. आता या मुद्यावर भाजप आक्रमक झाली आहे. आता भाजप आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष रेखा चैाधरी यांनी पत्रकार परिषद घेत या प्रभाग रचनेसंदर्भात शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या ठिकाणी प्रभाग वाढले पाहिजे. 27 गावात प्रभाग वाढले नाही. हे प्रभाग दुसऱ्या ठिकाणी वाढले. संपूर्ण प्रभाग रचना ही कायदेबाह्य आहे. नदी, रस्ते याचा कोणत्याही प्रकारचा विचार केला गेला नाही. ही प्रभाग रचना फक्त शिवसेनेची सोयीसाठी करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेसंदर्भात आम्ही हरकती घेऊ. पुढे काय करायचे हे देखील ठरवू असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचा पलटवार

या बाबत शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी भाजप आणि मनसे या दोघांवर पलटवार केला आहे. त्यांच्याकडे काही कामधंदा नाही. यांचा हाच फक्त अजेंडा आहे. जे काही केले शिवसेनेने केले हे असे बोलत राहणार. प्रभाग रचनेत काही चूक असल्यास आम्हीही हरकत घेऊ असा पलटवार भोईर यांनी सांगितले. (BJP MLA criticizes Shiv Sena over KDMC ward formation)

इतर बातम्या

CCTV | कोंबड्या नेणाऱ्या टेम्पोची बाईकला समोरासमोर धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुश करण्यासाठी शिवसेनेने सावरकरांचा फोटो लावला नाही, भाजपचा घणाघात

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली