ठाणे : कल्याणमध्ये एकीकडे लसीचा तुटवडा, तर दुसरीकडे नियोजनाचा अभाव असल्याचं दिसतंय. आठ आठ तास रांगेत उभे राहून देखील लोकांना लस मिळत नसल्याने नागरिकांचा रोष अनावर होतोय. असाच प्रकार कल्याणच्या अत्रे रंगमंदिर लसीकरण केंद्रावर घडला आहे. या ठिकाणी तरुणांपासून 72 वर्षीय आजींपर्यंत सगळेच तासंतास रांगेत उभे राहिले. एका तरुणाला तर चक्कर येऊन तो कोसळला तरीही लसीसाठी रांगेतच थांबला. मात्र, लसींचा तुटवडा असल्यानं कुपन अर्ध्या तासात संपले. त्यामुळे इतका वेळ रांगेत थांबूनही हाती निराशाच आली. यामुळे नागरिकांनी एकच गोंधळ घातला. संतप्त महिला केडीएमसी उपायुक्तांच्या केबिनमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर अखेर केडीएमसी उपायुक्तांनाही त्यांची केबीन सोडून लसीकरण केंद्रावर जावे लागेल.