AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील या शहराला पुराचा धोका जास्त, अभ्यासात धक्कादायक खुलासा

ठाण्यात पाऊस पडला तर पाणी बाहेर जाण्यासाठी प्रमुख १७ नाले आहेत. यापैकी ८ समुद्राच्या खालच्या भागात आहेत.

महाराष्ट्रातील या शहराला पुराचा धोका जास्त, अभ्यासात धक्कादायक खुलासा
| Updated on: Jun 20, 2023 | 3:15 PM
Share

प्रतिनिधी, ठाणे : भारतात शहरीकरण जोरात होत आहे. शहरीकरण नव्या समस्यांना सामोरे जात आहे. महाराष्ट्रातील ठाणे शहरात वाढत्या शहरीकरणाने पुराच्या घटनांत वाढ होणार आहे. देशात मोठ्या शहरांत पुराच्या घटना पाहायला मिळतात. ठाण्यातील वाढत्या शहरीकरणाचा अभ्यास मुंबईतील वीरमाता जीजाबाई प्राद्योगिकी संस्थानच्या वतीने करण्यात आला. ठाण्यातील पूर्व पूर प्रभावित भागात सिडको ब्रीज, वृंदावन सोसायटी, राबोडी, कोळीवाडा, क्रांतीनगर, मजीवाडा आणि चेंदनी कोळीवाडा या भागांचा समावेश होतो.

ठाण्यातील बांधकाम क्षेत्रात २७.५ टक्के वाढ

जर्नल ऑफ इंटेग्रेटेड डिझास्टर रिस्क मॅनेजमेंटच्या प्रकाशनातून दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात १९९५ ते २००० मध्ये बांधकाम क्षेत्रात २७.५ टक्के वाढ झाली. यामुळे मोकळा भाग, जंगल, पाण्याचे स्त्रोत आणि मॅग्रोव्हमध्ये क्षेत्र कमी झाले. मोकळ्या जागेत २९.५ टक्के जंगलात ८ टक्के, पाण्याच्या स्त्रोतात १८.९ टक्के आणि मॅग्रोव्ह ३६.३ टक्के कमी झाली.

२०५० पर्यंत बांधकाम क्षेत्र ५६ टक्के वाढणार

२०५० पर्यंत ठाण्यात बांधकाम क्षेत्रात ५६ टक्के वाढ होईल. त्यामुळे मोकळ्या भागात २९.५ टक्के, जंगलात ५५.९८ टक्के, पाण्याच्या स्त्रोतांत ८७.४ टक्के आणि मँग्रोव्ह ७२.१३ टक्के कमी होईल, असा अंदाज आहे. असे झाल्यास पाण्याची सिंचन क्षमता कमी होईल. शहरात पुराची समस्या आणखी वाढेल.

हवामानातील बदल, पावसाच्या घटना वाढत आहेत. जमिनीत पाणी न मुरल्याने समुद्रात वाहून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढत आहे. २०५० पर्यंत यात ३१.८ टक्क्यांची वाढ होणार आहे. त्यानंतर ही समस्या आणखी मोठे रूप धारण करेल.

पुराचा धोका का वाढला?

ठाण्यात पाऊस पडला तर पाणी बाहेर जाण्यासाठी प्रमुख १७ नाले आहेत. यापैकी ८ समुद्राच्या खालच्या भागात आहेत. परंतु, ६ समुद्राच्या उंच भागातील आहेत. तीन नाले हे समुद्राच्या पाणीपातळीवरील आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी पडल्यास ते पाणी रस्त्यावर साचते.

ठाण्यात ९ ठिकाणी पाणी साचून राहत असल्याचे आपत्ती व्यवस्तापन विभागाच्या लक्षात आले आहे. नगर रचना होताना ४.५ मीटर उंचीवर होणे गरजेचे आहे. शिवाय पाणी साठवून ठेवण्यासाठी तलाव, पम्पिंग सिस्टीमचा वापर करावा लागेल.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.