AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केडीएमसीत नियोजनाचा अभाव, लसीकरण केंद्राबाहेर 1 किमी रांग, नागरिक त्रस्त

राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरू केला आहे. त्यासाठी लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना पास देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मागील 2 दिवसांपासून कल्याण डोंबिवलीमधील महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लसी घेण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी होतेय.

केडीएमसीत नियोजनाचा अभाव, लसीकरण केंद्राबाहेर 1 किमी रांग, नागरिक त्रस्त
Reporter Amjad Khan
Reporter Amjad Khan | Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 11, 2021 | 11:53 AM
Share

ठाणे : राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरू केला आहे. त्यासाठी लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना पास देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मागील 2 दिवसांपासून कल्याण डोंबिवलीमधील महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लसी घेण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी होतेय. आज (11 ऑगस्ट) तर सकाळच्या सुमारास कल्याणच्या आचार्य अत्रे रंग मंदिराबाहेर जवळपास 1 किलोमीटरपर्यंत रांग गेली.

नागरिकांना 9 वाजता येऊनही टोकन देण्यात आलं नव्हतं. या रांगेत तरुण-तरुणींसह वृद्ध नागरिक देखील उभे होते. काही जणांनी तर काल (10 ऑगस्ट) रात्री 11 वाजल्यापासून रांग लावली होती, तर काही जणांनी सकाळी पहाटे साडेतीन चार वाजता या ठिकाणी रांग लावली होती. त्यामुळे नागरिकांचे मात्र प्रचंड हाल झाले. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या नियोजनहीन कारभाराविरोधात संताप व्यक्त केला.

वसई-विरारमध्ये लसीकरणासाठी मध्यरात्रीपासून लांबच लांब रांगा

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर वसई विरार नालासोपाऱ्यात लसीकरण केंद्रावर आदल्या दिवशीच्या दुपारी 3 वाजल्यापासूनच रांगा लागायला सुरुवात झाली. वसई विरार महापालिकेला शासनाकडून 4 हजार 850 कोव्हिशिल्डच्या लस उपलब्ध झाल्याने 10 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 17 लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस मिळणार आहे. त्यासाठी दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्रभर महिला, पुरुष रांगेत बसले आहेत.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

दुकानाचं शटर कापत असताना कटावणी खाली पडली, जोराचा आवाज, दरोड्याचा प्रयत्न फसला

VIDEO: मलंगगड भागात तरुणांचे जीवघेणे स्टंट, पोलिसांसमोर मोठं आव्हान

कोट्यवधींचे निधी मंजूर होतात, होर्डिंग लावले जातात, कामे कधी सुरु होणार? मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल

Mismanagement of Corona Vaccine center by KDMC 1 Km queue

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली