AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाम फुटला, जीव गुदमरण्याची वेळ, तब्बल सहा तासांपासून लाईट गेली, नेमकं कारण काय?

एकीकडे सर्वसामान्य नागरीक उकाड्याने हैराण झाले आहेत. अनेकांच्या घरात श्वास गुदमरतोय आणि अशा परिस्थितीत तब्बल पाच ते सात सात विजेचा खोळंबा होणं ही अतिशय धक्कादायक बाब आहे.

घाम फुटला, जीव गुदमरण्याची वेळ, तब्बल सहा तासांपासून लाईट गेली, नेमकं कारण काय?
| Updated on: Jun 13, 2023 | 10:09 PM
Share

कल्याण : कल्याण पूर्वेच्या मलंगगड रोड मार्गावर राधाकृष्ण पार्क पासून आडीवली, नांदिवली, अनमोल गार्डन, द्वारलीपर्यंतच्या अनेक भागांमध्ये गेल्या साडेपाच तासांपासून लाईट गेली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. या परिसरांमध्ये सकाळपासून लाईट ये-जा करत होती. पण संध्याकाळी चार वाजेपासून जी लाईट गेलीय ती अद्यापही परत आलेली नाही. त्यामुळे नागरीक उकाड्याने भयंकर हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे लाईट पुढचे आणखी तीन तास येणार नसल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये पसरली आहे. तसेच आम्ही महावितरणाचे पीआरओ अधिकाऱ्यांकडे फोनवर माहिती मिळवली असता त्यांनी या चर्चांना दुजोरा दिला आहे.

कल्याण पूर्वेत मलंगगड रोडवर शंभर फुटी रोडजवळ विजेचा खांब कोसळला आहे. या भागात मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या नाल्याजवळ विजेचा खांब कोसळला आहे. त्यामुळे तिथून आजूबाजूच्या लांबच्या परिसरात विजेचा खोळंबा झालाय. अनेक परिसरांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरीक उकाड्याने हैराण झाले आहेत. अनेकांच्या घरात श्वास गुदमरतोय आणि अशा परिस्थितीत तब्बल पाच ते सात सात विजेचा खोळंबा होणं ही अतिशय धक्कादायक बाब आहे.

घरात गरमी, बाहेर पाऊस आणि प्रचंड काळोख

कल्याण पूर्वेतील वातावरण दुपारपासून खराब आहे. या परिसरात अधूनमधून पाऊस पडतोय आणि घराबाहेर प्रचंड काळोख आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घर सोडून बाहेर जाणं देखील डोकेदुखी आहे. कल्याण शहरात दाटीवाटीची वस्ती आहे. इथे लाखो नागरीक वास्तव्यास आहेत. त्यामुळे लोकसंख्येची घनता साहजिकच जास्त आहे. पण अशा परिसरात नागरी सुविधा पुरवण्यात प्रशासन कितपत यशस्वी ठरतंय हा खरंच चिंतेचा विषय ठरला आहे.

पावसाचं वातावरण असल्याने महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं हे वास्तव आहे. अनेक लाईटमन हे अहोरात्र झटत असतात. हे अतिशय खरं आहे. पण तरीही तब्बल पाच ते सात तास विजेचा खोळंबा होणं अपेक्षित नाही, अशी भावना नागरिकांची आहे. एका मेट्रो सिटीत अशी घटना घडणं हे दुर्देवीच आहे. अनेकांना याचा फटका बसू शकतो.

लाईट कधी येणार?

दरम्यान, महावितरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित परिसरांमध्ये रात्री अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत लाईट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पुढचे आणखी दोन तास उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. विजेचा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांचं काम सुरु आहे. हे काम पूर्ण कधी होईल, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.