AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाम फुटला, जीव गुदमरण्याची वेळ, तब्बल सहा तासांपासून लाईट गेली, नेमकं कारण काय?

एकीकडे सर्वसामान्य नागरीक उकाड्याने हैराण झाले आहेत. अनेकांच्या घरात श्वास गुदमरतोय आणि अशा परिस्थितीत तब्बल पाच ते सात सात विजेचा खोळंबा होणं ही अतिशय धक्कादायक बाब आहे.

घाम फुटला, जीव गुदमरण्याची वेळ, तब्बल सहा तासांपासून लाईट गेली, नेमकं कारण काय?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 13, 2023 | 10:09 PM
Share

कल्याण : कल्याण पूर्वेच्या मलंगगड रोड मार्गावर राधाकृष्ण पार्क पासून आडीवली, नांदिवली, अनमोल गार्डन, द्वारलीपर्यंतच्या अनेक भागांमध्ये गेल्या साडेपाच तासांपासून लाईट गेली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. या परिसरांमध्ये सकाळपासून लाईट ये-जा करत होती. पण संध्याकाळी चार वाजेपासून जी लाईट गेलीय ती अद्यापही परत आलेली नाही. त्यामुळे नागरीक उकाड्याने भयंकर हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे लाईट पुढचे आणखी तीन तास येणार नसल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये पसरली आहे. तसेच आम्ही महावितरणाचे पीआरओ अधिकाऱ्यांकडे फोनवर माहिती मिळवली असता त्यांनी या चर्चांना दुजोरा दिला आहे.

कल्याण पूर्वेत मलंगगड रोडवर शंभर फुटी रोडजवळ विजेचा खांब कोसळला आहे. या भागात मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या नाल्याजवळ विजेचा खांब कोसळला आहे. त्यामुळे तिथून आजूबाजूच्या लांबच्या परिसरात विजेचा खोळंबा झालाय. अनेक परिसरांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरीक उकाड्याने हैराण झाले आहेत. अनेकांच्या घरात श्वास गुदमरतोय आणि अशा परिस्थितीत तब्बल पाच ते सात सात विजेचा खोळंबा होणं ही अतिशय धक्कादायक बाब आहे.

घरात गरमी, बाहेर पाऊस आणि प्रचंड काळोख

कल्याण पूर्वेतील वातावरण दुपारपासून खराब आहे. या परिसरात अधूनमधून पाऊस पडतोय आणि घराबाहेर प्रचंड काळोख आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घर सोडून बाहेर जाणं देखील डोकेदुखी आहे. कल्याण शहरात दाटीवाटीची वस्ती आहे. इथे लाखो नागरीक वास्तव्यास आहेत. त्यामुळे लोकसंख्येची घनता साहजिकच जास्त आहे. पण अशा परिसरात नागरी सुविधा पुरवण्यात प्रशासन कितपत यशस्वी ठरतंय हा खरंच चिंतेचा विषय ठरला आहे.

पावसाचं वातावरण असल्याने महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं हे वास्तव आहे. अनेक लाईटमन हे अहोरात्र झटत असतात. हे अतिशय खरं आहे. पण तरीही तब्बल पाच ते सात तास विजेचा खोळंबा होणं अपेक्षित नाही, अशी भावना नागरिकांची आहे. एका मेट्रो सिटीत अशी घटना घडणं हे दुर्देवीच आहे. अनेकांना याचा फटका बसू शकतो.

लाईट कधी येणार?

दरम्यान, महावितरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित परिसरांमध्ये रात्री अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत लाईट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पुढचे आणखी दोन तास उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. विजेचा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांचं काम सुरु आहे. हे काम पूर्ण कधी होईल, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....